शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

टीम इंडियाचा ‘दणादण’ सराव

By admin | Updated: December 5, 2014 23:56 IST

कसोटी मालिकेआधी टीम इंडियाने आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध फलंदाजी- गोलंदाजीचा दणादण सराव केला. दोन दिवसांचा हा सामना अनिर्णीत राहिला, पण वर्चस्व मात्र भारतीय खेळाडूंचेच होते.

अ‍ॅडिलेड : कसोटी मालिकेआधी टीम इंडियाने आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध फलंदाजी- गोलंदाजीचा दणादण सराव केला. दोन दिवसांचा हा सामना अनिर्णीत राहिला, पण वर्चस्व मात्र भारतीय खेळाडूंचेच होते.भारताने ९० षटकांत ३७५ धावा ठोकून ९ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज असल्याची चुणूक दाखविली. फलंदाजांच्या यशानंतर गोलंदाजही सव्वाशेर ठरले. भारतीय गोलंदाजांनी सामना संपेपर्यंत सीए एकादशचे ८३ धावांत पाच फलंदाज तंबूत पाठविले होते. भारताने सकाळी २ बाद ९९ वरून खेळ सुरू केला. विराट कोहली (६६) आणि मुरली विजय (६०) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२३ धावा खेचल्या. या दोघांना क्रमश: शून्य आणि पाच धावांवर जीवदान लाभले होते. अर्धशतकी खेळीनंतर दोघेही निवृत्त झाले. त्यांची जागा घेणारे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी फिरकी तसेच वेगवान मारा सहजपणे खेळून काढला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १०३ धावा ठोकल्या. रहाणे ५६ धावा काढून निवृत्त झाला. रोहित मात्र अर्धशतकापासून वंचित राहिला. तो चुकीने धावबाद झाला. त्याने ४८ धावा केल्या. रैना (२०) हा खेळताना अडखळत होता. रिद्धिमान साहाने ५१ धावांचे योगदान दिले. ९० व्या षटकांत तो बाद झाला. सीएकडून ज्योश लालोर याने १७ षटकांत ५९ धावा देत चार गडी बाद केले.यानंतर भारताने उर्वरित २४ षटकांत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यातील २१ षटके गोलंदाजी केल्यानंतर फुटबॉलचा सराव केला. उमेश यादवने ३० धावांत एक, वरुण अ‍ॅरोनने २८ धावांत एक, तर ईशांत शर्मा याने पाच षटकांत आठ धावा मोजून दोन गडी बाद केले. कर्ण शर्माला एक गडी बाद करण्यात यश आले. (वृत्तसंस्था)