शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

संघ अजूनही समतोल नाही : धोनी

By admin | Updated: October 26, 2015 23:09 IST

सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्थिर आणि संतुलित संघ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. नेमकी याच गोष्टीची आमच्या संघात कमतरता असल्याचे दिसत आहे

मुंबई : सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्थिर आणि संतुलित संघ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. नेमकी याच गोष्टीची आमच्या संघात कमतरता असल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपली निराशा व्यक्त केली. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर मालिकाही गमावल्यानंतर धोनीने आपले मत व्यक्त केले.सामन्यात नेमकी चूक कुठे झाली, असे विचारले असता धोनी म्हणाला, की हा प्रश्न आज नका विचारू. साडेचारशेच्या जवळपास धावा बनल्यानंतर हा प्रश्न विचारला गेला नाही पाहिजे. सामन्यात अनेक झेल सुटले, तसेच गोलंदाजीमध्येही खूप चुका झाल्या. २०-२५ षटकांपर्यंत आम्ही सामना नियंत्रित राखला होता. मात्र यानंतर तुफान वेगाने धावा फटकावल्या गेल्या. फलंदाजीबाबत धोनी म्हणाला, की ४३८-४४० लक्ष्य निश्चित सोपे नसते. आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली. आम्हीदेखील भागीदारी करायला पाहिजे होती. मात्र प्रत्येक वेळी यश मिळत नाही.दरवेळी फलंदाजीच्या क्रमवारीत केलेल्या बदलामुळे टीकेला सामोरे जावे लागलेल्या धोनीने याबाबतीत म्हटले, की मैदान, खेळपट्टी आणि स्थिती यानुसार बदल करावे लागतात. फलंदाजीला बळकटी आणण्यासाठी मी क्रमवारीत बदल केले होते. सध्या आपल्याकडे अधिक वेळ असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दबावाचा यशस्वीपणे सामना करू शकतील, असे खेळाडू निवडण्याची गरज आहे. सामना हरल्यानंतर खेळपट्टीवर टीका करणे हे नित्याचेच झाले आहे. ज्या खेळपट्टीवर आफ्रिकेने धावांचा हिमालय उभा केला, त्याच खेळपट्टीवर भारताचे शेर मात्र ढेर झाले. या खेळपट्टीवर टीका करताना कर्णधार धोनी म्हणाला, की ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. येथे फिरकीपटूंसाठी कोणताही टर्न मिळत नव्हता. येथे आमचे फिरकी आणि वेगवान गोलंदाज दोघेही अपयशी ठरले. यामुळे चौकार व षटकारांवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि त्यामुळेच इतका मोठा स्कोअर उभा राहिला. आपल्याला जोहान्सबर्ग किंवा इतर ठिकाणी टर्निंग खेळपट्टी मिळणार नाही. आपली ताकद वेगळी असून त्यानुसारच खेळपट्टी व्हायला हवी.प्लेसिसचे शतक सर्वोत्कृष्ट : डीव्हिलियर्समुंबई : तुफान फटकेबाजी करून भारतीय गोलंदाजी फोडून पाचव्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डीव्हीलियर्स याने फाफ डू प्लेसिसच्या शतकाला सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. प्लेसिसच्या शतकामुळे इतर फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली. सामन्यात राखलेल्या एकहाती वर्चस्वानंतर आपल्या संघाचे कौतुक करताना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजी क्रमवारी आणि गोलंदाजी क्रमवारी आमच्या संघात असल्याचे त्याने सांगितले.रविचंद्रन आश्विन आंतरराष्ट्रीय स्तराचा गोलंदाज आहे. त्याच्या दुखापतीमुळे निश्चितच भारताला मोठा फटका बसला. निर्णायक सामन्यात त्याची कमी भारताला नक्की जाणवली असेल. त्याचबरोबर मॉर्नी मॉर्केलची अनुपस्थिती आम्हाला खूप जाणवली. त्याची दुखापत आमच्यासाठी मोठा धक्का आहे.- एबी डीव्हीलियर्स, द. आफ्रिका - कर्णधार