शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

टीम इंडिया मुसंडी मारणार?

By admin | Updated: March 3, 2017 00:11 IST

भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना ३३३ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला.

नवी दिल्ली : भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना ३३३ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. आता मालिकेत मुसंडी मारण्याचे अवघड आव्हान आहे. १९३२पासून कसोटी क्रिकेट खेळत असलेला भारतीय संघ पहिला सामना गमावल्यानंतर केवळ तीनदा मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला, हा इतिहास आहे.पुण्यातील फिरकीला पूरक असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजांनी नांगी टाकताच विराटचा संघ धराशायी झाला. उर्वरित ३ सामने जिंकून मालिका-विजय कसा मिळवायचा, याचे उत्तर संघ व्यवस्थापनाला शोधायचे आहे. पुण्यातील पराभवानंतर कोहलीने लंकेविरुद्ध केलेल्या कामगिरीचे उदाहरण देत ‘आम्हाला केवळ अशा कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल,’ यावर भर दिला होता. दुसरीकडे, आॅस्ट्रेलियाने २००५च्या अ‍ॅशेस मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतरही मालिका गमावली होती. आॅस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना जिंकण्याचा विक्रम २०१ पैकी १०९ असा आहे. ४५ सामने गमावले. दुसऱ्या सामन्यातील त्यांचा विजयाचा विक्रम २०० पैकी ९७ विजय आणि ५२ पराभव, असा आहे.भारतीय संघाला शनिवारपासून बंगळुरु येथे पुन्हा सामोरे जायचे आहे. हा सामना जिंकून मालिकेत परतण्याचे वेध कोहली अँड कंपनीला असतील. चिन्नास्वामीवर भारताने आतापर्यंत २१ कसोटी सामने खेळले असून ६ जिंकले व ६ गमावले आहेत. ९ सामने अनिर्णीत राहिले. आॅस्ट्रेलियाने या मैदानावर ५ कसोटी सामने खेळले असून त्यांना २ विजय मिळाले. एका सामन्यात त्यांचा पराभव झाला, तर दोन सामने अनिर्णीत राहिले. मागच्या एका दशकापासून भारत या मैदानावर अपराजित राहिला आहे. यादरम्यान भारतीय संघाने ५ सामने खेळले. त्यांपैकी २ विजय मिळाले, तर ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत. २०१०मध्ये भारताने याच मैदानावर आॅस्ट्रेलियाला ७ गड्यांनी पराभूत केले होते. (वृत्तसंस्था) >आकडे काय सांगतात..?इंग्लंडविरुद्ध १९७२-७३मध्ये, आॅस्ट्रेलियाविरुद्ध २००१मध्ये तसेच श्रीलंकेविरुद्ध २०१५मध्ये पहिला सामना गमावल्यानंतरही भारताने मुसंडी मारून मालिका जिंकली. यांपैकी इंग्लंडविरुद्ध चारपेक्षा अधिक सामने खेळले गेले. अन्य दोन मालिकांमध्ये प्रत्येकी ३ कसोटी सामन्यांचा समावेश होता.वेस्ट इंडीजविरुद्ध १९८७-८८ आणि इंग्लंडविरुद्ध २००२मध्ये भारताने ४ सामन्यांच्या मालिका पहिला सामना गमावल्यानंतरही १-१ अशा बरोबरीत सोडविल्या आहेत.भारतीय संघ पहिला सामना गमावल्यानंतर एकूण ८ वेळा मालिका बरोबरीत सोडविण्यात यशस्वी ठरला. कसोटी मालिकांमध्ये भारताने १४० पैकी ३६ वेळा पहिल्या सामन्यात विजय नोंदविला. ५२ वेळा संघ पराभूत झाला, तर एक सामना टाय झाला. अन्य ४९ सामने अनिर्णीत राहिले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील भारताचा रेकॉर्ड फारच चांगला आहे. १४० पैकी ४२ विजय, ३८ पराभव आणि ६० सामने अनिर्णीत अशी उत्साहवर्धक आकडेवारी पाहायला मिळते. भारताने तिसऱ्या कसोटीच्या रूपात ११८ पैकी ३२ विजय, ३५ पराभव आणि ५१ ड्रॉ, तसेच चौथ्या कसोटीच्या रूपात ५७ पैकी १४ सामने जिंकले व १८ गमावले. अन्य २५ सामने अनिर्णीत राहिले होते.१९७२-७३मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात दिल्लीत पहिला सामना गमावल्यानंतर कोलकाता येथील पुढील सामन्यात इंग्लंडवर २८ धावांनी विजय नोंदविला. चेन्नईचा तिसरा सामना पुन्हा ४ गड्यांनी विजय नोंदवून कानपूर तसेच मुंबईतील कसोटी सामने अनिर्णीत राखून २-१ ने मालिका जिंकली होती. २००१मध्ये सौरभ गांगुलीच्या संघाने अशीच कमाल केली. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटी १० गड्यांनी गमावल्यानंतर कोलकाता कसोटीत फॉलोआॅननंतरही लक्ष्मण तसेच भज्जीच्या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर १७१ धावांनी विजय मिळविला. चेन्नईचा पुढील सामना दोन गड्यांनी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली. >२०१५मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेला गाले कसोटी ६३ धावांनी गमावली होती. नंतर कोलंबोत झालेले दोन्ही कसोटी सामने अनुक्रमे २७६ आणि ११७ धावांनी जिंकून मालिका २-१ ने जिंकली.