शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाने मोकळेपणाने खेळावे

By admin | Updated: March 25, 2016 01:59 IST

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच

- सौरव गांगुली लिहितो़...

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच स्तब्ध झाली असेल. खेळपट्टीवर जम बसलेले दोन फलंदाज असताना तीन चेंडंूत दोन धावा काढता न येणे, हे न पटण्यासारखे आहे. दुसरा चौकार काढल्यानंतर त्यांनी केवळ एकेरी धाव काढायला हवी होती आणि धोनीने केलेल्या क्षेत्ररक्षणाची रचना पाहता ते सहज शक्य होते. त्यामुळे धावसंख्या बरोबरीत आली असती व धोनीला क्षेत्ररक्षकांना जवळ आणणे भाग पडले असते. शेवटच्या चेंडूपर्यंत हिमतीने झुंज दिल्याबद्दल भारतीय संघ, धोनी व पांड्याला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. स्पर्धेमध्ये अद्याप भारतीय फलंदाज चमक दाखवू शकलेले नाहीत, हे मात्र मान्य करायलाच हवे. भारताचे सामने जिथे झाले त्या तीनही खेळपट्ट्यांवरील फिरकी आश्चर्यजनक होती. चेंडू फिरकी घेईल, अशा खेळपट्ट्या बनवण्याच्या सूचना दिल्याचा संशय व्यक्त होत आहे, पण त्यात तथ्य नाही. कोलकाताच्या बाबतीत मी ठामपणे सांगतो, की पाऊस पडल्याने अतिरिक्त ओलाव्यामुळे चेंडू फिरकी घेऊ लागला. ग्राउंड्समननी फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या तयार करण्याच्या अतिउत्साहात कोरड्या खेळपट्ट्या तयार केल्या. त्यामुळे चेंडू इतका वळत होत असल्याचे मला वाटते. बुधवारी भारतीय फलंदाजीचा क्रम तात्पुरत्या स्वरूपाचा होता. रोहित व शिखरच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा होती, मात्र माझे मत वेगळे आहे. ते न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले होते आणि टी-२० क्रिकेटमध्ये असे होत असते. त्यांनी वृत्तपत्र वाचणे बंद करून मुक्तपणे खेळले पाहिजे. कदाचित खेळपट्टीमुळे ते मुक्तपणे खेळू शकत नसतील, पण मोहालीतील चांगल्या खेळपट्टीवर ही स्थिती बदलू शकेल. चांगल्या टणक खेळपट्ट्या फलंदाजांसाठी लाभदायक ठरू शकतील. भारताने विजय खेचून आणला, पण मला त्यांची कामगिरी फारशी प्रभावी वाटली नाही. घरच्या मैदानांवर विश्वचषक खेळणे सोपे नाही, पण काही वेळा चाहत्यांच्या अपेक्षांमुळे कामगिरी उंचावते. त्यामुळे भारताने दबावाखाली न येता खेळाचा आनंद घेतला पाहिजे. या संघात काही उत्तम फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, फक्त त्यांनी मोकळेपणाने खेळणे गरजेचे आहे. धोनीने सुरुवातीच्या फळीत फलंदाजीला यावे, असे मत मी अनेकदा व्यक्त केले आहे. तो सहाव्या क्रमांकावर येणे पसंत करतो, मात्र युवराज व रैना अद्याप चौथ्या क्रमांकावर क्षमतेनुसार खेळलेले नसल्याने कदाचित आॅस्ट्रेलियाविरुद्ध धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीतील स्वत:चे स्थान बदलावे लागेल. कारण मधल्या फळीला प्रोत्साहनाची गरज आहे आणि धोनी भविष्यात पुन्हा सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. (गेमप्लान)