शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

टीम इंडिया सध्या अडचणीत

By admin | Updated: October 28, 2015 22:27 IST

भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट आॅल स्टार्स मालिकेसाठी सचिनने मुंबईत कसून सराव केला. यानंतर त्याने टीम इंडियाविषयीचे मत व्यक्त केले.सचिन म्हणाला की, सध्याचा आपला संघ उत्तमच आहे. मात्र प्रत्येक संघाला कधीना कधी अशा अडचणीच्या काळातून जावेच लागते. शिवाय खेळामध्ये जय- पराजय होत राहतात. अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी घडतात. टीकाकारांनीही संघाच्या पराभवानंतर आपला निर्णय देऊ नये. क्रिकेटविषयी आपण खुप जोश राखून असतो. मात्र त्याचबरोबर थोडा संयम देखील बाळगावा.’एकदिवसीय मालिका गमविल्यानंतर टीम इंडियावर फलंदाजी क्रमावरून कठोर टीका झाली. मात्र सचिनने यावर प्रतिक्रीया देण्यास नकार देत, मी संघाचा भाग नसल्याने काही माहिती नसताना मत मांडणे योग्य नसल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ प्रशिक्षकाविना खेळत असून टीम इंडियाचा प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी या प्रश्नावर सचिन म्हणाला की, प्रशिक्षक कुणीही असो टीम इंडियाला यावरून फरक पडत नाही. परंतु तो प्रशिक्षक सक्षम असावा असे स्पष्ट मत सचिनने मांडले. (वृत्तसंस्था)आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बदललेल्या नियमांबाबत सचिन म्हणाला की, बदललेल्या नियमांमुळे खूप मोठा परिणाम किंवा बदल झाला आहे. ज्यावेळी मी खेळत होतो तेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार क्षेत्ररक्षकांचा नियम होता. परंतु आज एकदिवसीयचे जवळपास सर्वच नियम बदलले आहेत. केवळ चार क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर ठेवू शकत असल्याने गोलंदाजांवर मोठे दडपण आलेले असते.आयसीसीसीने बदललेल्या नियमांमुळे फलंदाजांना खूप मोठा फायदा मिळत असून ते एकदिवसीय सामन्यात विशाल धावसंख्या उभारताना दिसतात. ज्या फटक्यांचा कधी विचारही केला जाऊ शकत नव्हता असे फटके आज टी-२० क्रिकेटमध्ये खेळले जात आहेत. यामुळेच संघाच्या धावसंख्येत खूप मोठी वाढ होत आहे. - सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू