शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
4
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
5
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
6
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
7
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
8
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
9
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
10
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
11
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
12
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
13
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
14
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
15
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
16
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
17
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
18
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
19
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
20
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडिया सध्या अडचणीत

By admin | Updated: October 28, 2015 22:27 IST

भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट आॅल स्टार्स मालिकेसाठी सचिनने मुंबईत कसून सराव केला. यानंतर त्याने टीम इंडियाविषयीचे मत व्यक्त केले.सचिन म्हणाला की, सध्याचा आपला संघ उत्तमच आहे. मात्र प्रत्येक संघाला कधीना कधी अशा अडचणीच्या काळातून जावेच लागते. शिवाय खेळामध्ये जय- पराजय होत राहतात. अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी घडतात. टीकाकारांनीही संघाच्या पराभवानंतर आपला निर्णय देऊ नये. क्रिकेटविषयी आपण खुप जोश राखून असतो. मात्र त्याचबरोबर थोडा संयम देखील बाळगावा.’एकदिवसीय मालिका गमविल्यानंतर टीम इंडियावर फलंदाजी क्रमावरून कठोर टीका झाली. मात्र सचिनने यावर प्रतिक्रीया देण्यास नकार देत, मी संघाचा भाग नसल्याने काही माहिती नसताना मत मांडणे योग्य नसल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ प्रशिक्षकाविना खेळत असून टीम इंडियाचा प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी या प्रश्नावर सचिन म्हणाला की, प्रशिक्षक कुणीही असो टीम इंडियाला यावरून फरक पडत नाही. परंतु तो प्रशिक्षक सक्षम असावा असे स्पष्ट मत सचिनने मांडले. (वृत्तसंस्था)आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बदललेल्या नियमांबाबत सचिन म्हणाला की, बदललेल्या नियमांमुळे खूप मोठा परिणाम किंवा बदल झाला आहे. ज्यावेळी मी खेळत होतो तेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार क्षेत्ररक्षकांचा नियम होता. परंतु आज एकदिवसीयचे जवळपास सर्वच नियम बदलले आहेत. केवळ चार क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर ठेवू शकत असल्याने गोलंदाजांवर मोठे दडपण आलेले असते.आयसीसीसीने बदललेल्या नियमांमुळे फलंदाजांना खूप मोठा फायदा मिळत असून ते एकदिवसीय सामन्यात विशाल धावसंख्या उभारताना दिसतात. ज्या फटक्यांचा कधी विचारही केला जाऊ शकत नव्हता असे फटके आज टी-२० क्रिकेटमध्ये खेळले जात आहेत. यामुळेच संघाच्या धावसंख्येत खूप मोठी वाढ होत आहे. - सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू