शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जलतरण : रुपाली रेपाळे अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पार केले गेटवे तर धरमतर अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 21:08 IST

अभिलाष, जान्हवी आणि राम या तिघांनी मिश्र रीले पद्धतीने हे अंतर 9 तास आणि 22 मिनिटांमध्ये पार केले.

ठळक मुद्देरुपाली यांनी वयाच्या 12व्या वर्षी हे अंतर पार करण्याचा विक्रम केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलाष, जान्हवी आणि राम यांनी सहजपणे हे अंतर पार केले.

मुंबई : रुपाली रेपाळे जलतरण अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आज गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर हे अंतर पार केले. गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर हे अंतर 38 किलोमीटर एवढे आहे. या अकादमीतील अभिलाष, जान्हवी आणि राम या तिघांनी मिश्र रीले पद्धतीने हे अंतर 9 तास आणि 22 मिनिटांमध्ये पार केले. हे अंतर पार करण्यासाठी दुपारी 12.47 वाजता सुरुवात केली आणि पहाटे 3.25 वाजता त्यांनी हे अंतर पार केले.

रुपाली यांनी वयाच्या 12व्या वर्षी हे अंतर पार करण्याचा विक्रम केला होता. हे अंतर पार करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलाष, जान्हवी आणि राम यांनी सहजपणे हे अंतर पार केले. हे प्रयत्न करताना या मुलांच्या प्रशिक्षकांसह त्यांच्या पालकांचा उत्साहदेखाली चांगला होता. अथक मेहनत, समर्पण आणि जिद्द ही त्यांच्या या यशामागची त्रिसूत्री आहे. हे अंतर पार करणारा अभिलाष हा फक्त 13 वर्षांचा आहे, तर जान्हवीचे वय 17 वर्षे आहे. त्यांच्याबरोबर अनुभवी असलेल्या रामचे वय 26 वर्षे आहे. स्पोट्रा कौन्सिल ऑफ पलावा यांनी अभिलाषला रायझिंग स्टार या उपक्रमासाठी निवडलेले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर देशाचे नाव उंचवावे, असा स्पोट्रा कौन्सिल ऑफ पलावा यांचा मानस आहे.

 

टॅग्स :Sportsक्रीडा