शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

खेळण्याची शैली बदलणार नाही

By admin | Updated: August 17, 2015 22:53 IST

भारताला पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असला तरी उर्वरित दोन कसोटी सामन्यांत संघाच्या खेळण्याच्या

कोलंबो : भारताला पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असला तरी उर्वरित दोन कसोटी सामन्यांत संघाच्या खेळण्याच्या शैलीमध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली. संघ दडपणाखाली आला म्हणून भारताने सामना गमावला. एका सामन्यात विजय मिळविला म्हणजे संघाला पुन्हा लय प्राप्त होईल, असेही शास्त्री म्हणाले. गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत सामन्याचे चित्र अचानक बदलले आणि भारताला ६३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पत्रकारांसोबत बोलताना शास्त्री म्हणाले,‘आम्ही खेळाच्या शैलीमध्ये कुठलाच बदल करणार नाही. आम्ही पहिल्या सामन्यादरम्यान वापरलेली रणनीती कायम राखू. आम्ही पहिल्या लढतीत एक चूक केली. अनुकूल निकाल मिळविण्यासाठी अखेरपर्यंत लढत देणे आवश्यक असते.’संघावर दडपण आहे का, याबाबत बोलताना शास्त्री यांनी नकारात्मक उत्तर दिले. शास्त्री म्हणाले,‘दडपणाचा प्रश्नच उद््भवत नाही. खेळपट्टीचे स्वरूप बदलू शकते, असा विचार करीत संघाने दडपण स्वीकारले. एक विजय मिळविल्यानंतर ती अनेक विजयांची सुरुवात ठरणार आहे. ’१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ४९.५ षटकांत ११२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ अनेकदा तीन फिरकीपटूंसह खेळतो. अश्विनने या लढतीत चांगली कामगिरी केली, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. भारताने पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी घेतली होती, पण चुकीमुळे भारताला सामना गमवावा लागला. त्यामुळे कोहली व शिखर धवन यांची शतके आणि आश्विनची १० बळी घेण्याची कामगिरी अखेर व्यर्थच ठरली. (वृत्तसंस्था)