शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

खेळण्याची शैली बदलणार नाही

By admin | Updated: August 17, 2015 22:53 IST

भारताला पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असला तरी उर्वरित दोन कसोटी सामन्यांत संघाच्या खेळण्याच्या

कोलंबो : भारताला पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असला तरी उर्वरित दोन कसोटी सामन्यांत संघाच्या खेळण्याच्या शैलीमध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली. संघ दडपणाखाली आला म्हणून भारताने सामना गमावला. एका सामन्यात विजय मिळविला म्हणजे संघाला पुन्हा लय प्राप्त होईल, असेही शास्त्री म्हणाले. गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत सामन्याचे चित्र अचानक बदलले आणि भारताला ६३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पत्रकारांसोबत बोलताना शास्त्री म्हणाले,‘आम्ही खेळाच्या शैलीमध्ये कुठलाच बदल करणार नाही. आम्ही पहिल्या सामन्यादरम्यान वापरलेली रणनीती कायम राखू. आम्ही पहिल्या लढतीत एक चूक केली. अनुकूल निकाल मिळविण्यासाठी अखेरपर्यंत लढत देणे आवश्यक असते.’संघावर दडपण आहे का, याबाबत बोलताना शास्त्री यांनी नकारात्मक उत्तर दिले. शास्त्री म्हणाले,‘दडपणाचा प्रश्नच उद््भवत नाही. खेळपट्टीचे स्वरूप बदलू शकते, असा विचार करीत संघाने दडपण स्वीकारले. एक विजय मिळविल्यानंतर ती अनेक विजयांची सुरुवात ठरणार आहे. ’१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ४९.५ षटकांत ११२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ अनेकदा तीन फिरकीपटूंसह खेळतो. अश्विनने या लढतीत चांगली कामगिरी केली, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. भारताने पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी घेतली होती, पण चुकीमुळे भारताला सामना गमवावा लागला. त्यामुळे कोहली व शिखर धवन यांची शतके आणि आश्विनची १० बळी घेण्याची कामगिरी अखेर व्यर्थच ठरली. (वृत्तसंस्था)