शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विराटसेनेला लंकेचा शॉक!

By admin | Updated: June 8, 2017 22:56 IST

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेच्या अननुभवी संघाने आज शॉक दिला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज झालेल्या

ऑनलाइन लोकमत
 लंडन, दि. 8 - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेच्या अननुभवी संघाने आज शॉक दिला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज झालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुणतिलका, कुशल मेंडिस, कुशल परेरा कर्णधार अँजेलो मॅथ्युज आणि गुणरत्ने यांनी केलेल्या जिगरबाज खेळाच्या जोरावर श्रीलंकेने भारतावर सात गडी राखून मात केली.  
 भारताने दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्का बसला. श्रीलंकेचा सलामीवीर निरोशन डिकवेला याला भुवनेश्वर कुमारने तंबूची वाट दाखवत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र गुणतिलका (76) आणि मेंडिस (89) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी करत लंकेला सामन्यात पुनरागमन करून दिले.  दरम्यान, भारतीय क्षेत्ररक्षकांना चपळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत या दोघांनाही माघारी धाडले. 
खेळपट्टीवर स्थिरावलेले दोन फलंदाज बाद झाल्यावर लंकेचा डाव अडखळेल, असे वाटले होते. पण कुशल परेरा आणि  अँजेलो मॅथ्युज यांनी 75 धावा जोडत सामन्याचे पारडे श्रीलंकेच्या बाजूने झुकवले. नाबाद 52 धावा फटकावणाऱ्या मॅथ्युजने गुणरत्नेच्या (नाबाद 34) साथीने विजयाची औपचारिकता पार पाडताना लंकेला. 49 व्या षटकात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला दमदार सुरुवात करून दिली.  रोहित-धवनने मागील सामन्याप्रमाणेच प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेत  24.5 षटकांत १३८ धावांची भागीदारी केली. दरम्यान रोहित 78 धावा काढून बाद झाला. या खेळीमध्ये त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले.  रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला कर्णधार विराट कोहलीही पाठोपाठ माघारी परतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. तर पाकिस्तानविरुद्ध स्टार ठरलेला युवराजही खेळपट्टीवर फार काळ तग धरु शकला नाही. गुणरत्नेने  सात धावांवर त्याचा त्रिफळा उडवला.
तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर धवन आणि धोनीने भारताला सावरले. कारकिर्दीतील दहावी शतकी खेळी करणाऱ्या धवनने धोनीसोबत 82 धावांची भागीदारी करत भारताला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.  मात्र अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजीच्या नादात तो बाद झाला. धोनीने 63 धावांची आक्रमक खेळी करत संघाला तीनशेपार नेले. तर केदार जाधवने 13 चेंडूत 25 धावा वसूल करत संघाला निर्धारीत 50 षटकांत 6 बाद 321 धावांपर्यंत मजल मारून दिली.