शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

माझ्यासाठी केवळ खेळाडू ‘व्हीआयपी’, मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलण्यावर भर देणार: क्रीडामंत्री राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:22 IST

‘माझ्यासाठी खेळाडू व्हीआयपी असेल.’ सन्मान आणि सुविधा पुरविण्यास प्राधान्य देत क्रीडा मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस नवे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी व्यक्त केला.

नवी दिल्ली : ‘माझ्यासाठी खेळाडू व्हीआयपी असेल.’ सन्मान आणि सुविधा पुरविण्यास प्राधान्य देत क्रीडा मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस नवे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी व्यक्त केला.अथेन्स आॅलिम्पिक २००४ मध्ये नेमबाजीचे रौप्यपदक विजेते राहिलेले राठोड यांची कालच विजय गोयल यांच्याऐवजी क्रीडा आणि युवा मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) मंत्री म्हणून नियुक्ती झाली. आज त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राठोड म्हणाले, ‘सर्वांत आधी मला मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलायचा आहे. माझ्यासाठी व्हीआयपी केवळ खेळाडू असेल, अन्य कुणीही नाही. सर्वांचा असाच दृष्टिकोन असायला हवा.’‘एक खेळाडू ते मंत्री’ या प्रवासाला उजाळा देताना ते पुढे म्हणाले, ‘खेळाडूला काय अडचणी येतात याची मला जाणीव आहे. खेळाडूचा मंत्रालयाशी थेट कसा संपर्क राहील, ही बाब सोपी करू इच्छितो.’जयपूरचे(ग्रामीण) लोकसभेत प्रथमच प्रतिनिधित्व करीत असलेले राठोड म्हणाले,‘क्रीडा मंत्रालयाचा माझा प्रवास ‘रिसेप्शन’ पासून सुरू होतो. येथे येण्याची परवानगी घ्यावी लागते. येथे खेळाडूंना येणाºया अडचणींची मला जाणीव आहे. खेळाडूंची मदत करणारे काही चांगले अधिकारी देखील येथे आहेत. अशा अधिकाºयांची संख्या वाढविण्यावर भर असेल. स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या खेळाडूंना आमची कधीही गरज असल्याने हे मंत्रालय २४ तासांचे असेल. खेळाडूंच्या सेवेसाठी असल्याने आम्हाला त्यांच्यासाठीच काम करावे लागेल. खेळाडूंना सन्मान, सुविधा देण्यावर मी फोकस करणार आहे.’क्रीडा विकास विधेयक संसदेच्या पटलावर ठेवणे, खेळ फिक्सिंगमुक्त ठेवण्यासाठी काय प्रयत्न होतील,असे विचारताच ते म्हणाले, ‘मीविविध योजनांकडे लक्ष देणार आहे. भारतीय खेळांमध्ये फिक्सिंगसारखे प्रकार होणार नाहीत याकडे विशेष लक्ष असेल.’ (वृत्तसंस्था)माजी खेळाडू या नात्याने तुमच्यावर अपेक्षांचे अधिक ओझे असेल का, असे विचारताच ते म्हणाले, ‘खेळाने मला आव्हानांचा सामना करणे शिकविले आहे. अपेक्षा तर आधीपासून आहेत. पण खेळाडू पराभवाला घाबरत नाही. जय-पराजयाच्या भीतीने माघार घेणे मला पसंत नाही.’