शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे हरभजन अपयशी

By admin | Updated: August 18, 2015 22:54 IST

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे हरभजन सिंगवर दडपण आले आहे. भारताचा माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याच्या मते

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे हरभजन सिंगवर दडपण आले आहे. भारताचा माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याच्या मते या अनुभवी फिरकीपटूने पुनरागमन करताना आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक प्रयत्न केल्यामुळे तो फ्लॉप झाला. फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवलेल्या या लढतीत हरभजनने २५ षटकांत केवळ एक बळी घेतला. भारताला या लढतीत ६३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. श्रीलंकेत २२ वर्षांपूर्वी मालिका विजय साकारणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असलेला राजू म्हणाला, ‘तीन फिरकीपटूंना खेळविण्याची रणनीती यशस्वी ठरण्यासाठी धावफलकावर पुरेशा धावा असणे आवश्यक असते. ज्या वेळी भारत तीन फिरकीपटूंसह खेळत होता, त्या वेळी वीरेंद्र सेहवागसारखा फलंदाज होता. तो खोऱ्याने धावा काढत होता. ४०० चा स्कोअर नेहमी उपयुक्त ठरतो. याव्यतिरिक्त संघात अष्टपैलू गोलंदाजही होते. सध्याचा संघ युवा असून अनुभवानंतर या संघाची कामगिरी सुधारेल.’राजू म्हणाला, ‘१९९३ मध्ये मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेत विजय मिळविणाऱ्या संघाचा सदस्य होतो. फिरकी ही त्या संघाचे शक्तिस्थळ होते. श्रीलंका संघात मुथय्या मुरलीधरन व्यतिरिक्त चामिंडा वास होता. तो विकेट घेण्यात वाक् बगार होता. आमच्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव होता. त्यामुळे तेथील खेळपट्ट्यांवर आम्हाला अडचण भासली नाही. ज्या वेळी आम्ही आॅस्ट्रेलिया किंवा इंग्लंडविरुद्ध भारतात खेळलो, त्या वेळी ४०० ते ५०० धावांचा स्कोअर केला.’पहिल्या कसोटी सामन्यातील श्रीलंकेच्या विजयाचे शिल्पकार रंगाना हेराथ व थारिंडू कौशल यांची राजूने प्रशंसा केली. त्यांना स्थानिक वातावरणात खेळण्याचा लाभ मिळाला, असेही राजूने सांगितले. गोलंदाजी शैलीमध्ये बदल करण्यासाठी हरभजनला पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी व्हावे लागले. त्यानंतर त्याने संघातील स्थान गमावले. आता त्याने पुनरागमन केले असून अतिरिक्त प्रयत्न केले. त्याच्याकडे मोठा अनुभव असून कुठल्या परिस्थितीत कसे खेळायचे याची त्याला चांगली कल्पना आहे. पण ज्या वेळी खेळाडू पुनरागमन करीत असतो, त्या वेळी तो आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक प्रयत्न करतो, ही मुख्य अडचण ठरते. अतिरिक्त प्रयत्न अनेकदा अपयशाचे कारण ठरतात.- व्यंकटपती राजूफिरकीपटूसाठी कर्णधाराचा विश्वास असणे महत्त्वाचे असते, असे मत भारताचे दिग्गज फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले. प्रसन्ना म्हणाले, ‘‘कर्णधाराचा विश्वास फिरकीपटूसाठी महत्त्वाचा असतो. एक गोलंदाज म्हणून तुम्ही किती उपयुक्त आहात, हे समजण्याची क्षमता कर्णधारामध्ये असणे आवश्यक आहे.गोलंदाजाला आवडीच्या क्षेत्ररक्षणासह गोलंदाजी करण्याची मुभा मिळायला पाहिजे.’’ कर्णधार एमएके पतौडीसोबत जसे माझे संबंध होते त्याप्रमाणे फिरकीपटूचे आपल्या कर्णधारासोबत संबंध असायला हवेत, असे प्रसन्ना म्हणाले. प्रसन्ना यांनी सांगितले, ‘‘पतौडीसोबत मी एकवेळ क्षेत्ररक्षण सजविल्यानंतर मी काय करणार आहे, याची त्यांना कल्पना येत होती. (वृत्तसंस्था)