शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे हरभजन अपयशी

By admin | Updated: August 18, 2015 22:54 IST

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे हरभजन सिंगवर दडपण आले आहे. भारताचा माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याच्या मते

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीमुळे हरभजन सिंगवर दडपण आले आहे. भारताचा माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याच्या मते या अनुभवी फिरकीपटूने पुनरागमन करताना आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक प्रयत्न केल्यामुळे तो फ्लॉप झाला. फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवलेल्या या लढतीत हरभजनने २५ षटकांत केवळ एक बळी घेतला. भारताला या लढतीत ६३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. श्रीलंकेत २२ वर्षांपूर्वी मालिका विजय साकारणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य असलेला राजू म्हणाला, ‘तीन फिरकीपटूंना खेळविण्याची रणनीती यशस्वी ठरण्यासाठी धावफलकावर पुरेशा धावा असणे आवश्यक असते. ज्या वेळी भारत तीन फिरकीपटूंसह खेळत होता, त्या वेळी वीरेंद्र सेहवागसारखा फलंदाज होता. तो खोऱ्याने धावा काढत होता. ४०० चा स्कोअर नेहमी उपयुक्त ठरतो. याव्यतिरिक्त संघात अष्टपैलू गोलंदाजही होते. सध्याचा संघ युवा असून अनुभवानंतर या संघाची कामगिरी सुधारेल.’राजू म्हणाला, ‘१९९३ मध्ये मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेत विजय मिळविणाऱ्या संघाचा सदस्य होतो. फिरकी ही त्या संघाचे शक्तिस्थळ होते. श्रीलंका संघात मुथय्या मुरलीधरन व्यतिरिक्त चामिंडा वास होता. तो विकेट घेण्यात वाक् बगार होता. आमच्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव होता. त्यामुळे तेथील खेळपट्ट्यांवर आम्हाला अडचण भासली नाही. ज्या वेळी आम्ही आॅस्ट्रेलिया किंवा इंग्लंडविरुद्ध भारतात खेळलो, त्या वेळी ४०० ते ५०० धावांचा स्कोअर केला.’पहिल्या कसोटी सामन्यातील श्रीलंकेच्या विजयाचे शिल्पकार रंगाना हेराथ व थारिंडू कौशल यांची राजूने प्रशंसा केली. त्यांना स्थानिक वातावरणात खेळण्याचा लाभ मिळाला, असेही राजूने सांगितले. गोलंदाजी शैलीमध्ये बदल करण्यासाठी हरभजनला पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी व्हावे लागले. त्यानंतर त्याने संघातील स्थान गमावले. आता त्याने पुनरागमन केले असून अतिरिक्त प्रयत्न केले. त्याच्याकडे मोठा अनुभव असून कुठल्या परिस्थितीत कसे खेळायचे याची त्याला चांगली कल्पना आहे. पण ज्या वेळी खेळाडू पुनरागमन करीत असतो, त्या वेळी तो आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक प्रयत्न करतो, ही मुख्य अडचण ठरते. अतिरिक्त प्रयत्न अनेकदा अपयशाचे कारण ठरतात.- व्यंकटपती राजूफिरकीपटूसाठी कर्णधाराचा विश्वास असणे महत्त्वाचे असते, असे मत भारताचे दिग्गज फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले. प्रसन्ना म्हणाले, ‘‘कर्णधाराचा विश्वास फिरकीपटूसाठी महत्त्वाचा असतो. एक गोलंदाज म्हणून तुम्ही किती उपयुक्त आहात, हे समजण्याची क्षमता कर्णधारामध्ये असणे आवश्यक आहे.गोलंदाजाला आवडीच्या क्षेत्ररक्षणासह गोलंदाजी करण्याची मुभा मिळायला पाहिजे.’’ कर्णधार एमएके पतौडीसोबत जसे माझे संबंध होते त्याप्रमाणे फिरकीपटूचे आपल्या कर्णधारासोबत संबंध असायला हवेत, असे प्रसन्ना म्हणाले. प्रसन्ना यांनी सांगितले, ‘‘पतौडीसोबत मी एकवेळ क्षेत्ररक्षण सजविल्यानंतर मी काय करणार आहे, याची त्यांना कल्पना येत होती. (वृत्तसंस्था)