शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

शशांक मनोहरांवर आज मोहर?

By admin | Updated: October 4, 2015 04:14 IST

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आज रविवारी होणाऱ्या बैठकीत माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर सर्वसंमतीने पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. या बैठकीला वादग्रस्त माजी

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आज रविवारी होणाऱ्या बैठकीत माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर सर्वसंमतीने पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. या बैठकीला वादग्रस्त माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन उपस्थित राहणार नसल्याचे कळते.श्रीनिवासन यांनी मागील बैठकीत तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे प्रमुख या नात्याने भाग घेतला होता. या बैठकीला मात्र टीएनसीएचे उपाध्यक्ष पी. एस. रमण हे संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने हजेरी लावतील. श्रीनिवासन यांची अनुपस्थिती त्यांच्या गटाच्या माघारीचे संकेत आहेत. शिवाय श्रीनिवासन स्वत: बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत स्वत:ला सहभागी करून घेण्यास इच्छुक नाहीत, हे निश्चित झाले. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी अलीकडे मनोहर हेच सर्वसंमतीने एकमेव उमेदवार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.श्रीनिवासन यांच्या गटाच्या अंतर्गत सूत्रानुसार श्रीनिवासन बीसीसीआयच्या कामापासून स्वत:ला दूर ठेवू इच्छितात. २०१७ पर्यंत कितीही प्रयत्न केला तरी आपली डाळ शिजणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे. सध्या ते सिमेंट व्यवसायावर लक्ष केंद्रित करू इच्छितात. आठवडाभराआधी श्रीनिवासन माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अध्यक्षपदासाठी तडजोड करीत होते. गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीकडे श्रीनिवासन यांचा डोळा लागला होता. शाह यांचा पाठिंबा मिळाल्यास आपण अध्यक्ष बनू शकतो, अशी त्यांना आशा होती. पण मनोहर यांना जो राजकीय पाठिंबा मिळाला त्यावरून मनोहर हेच अध्यक्ष बनू शकतात हे स्पष्ट झाले. श्रीनिवासन यांची शाह यांच्याशी भेट होऊ न शकल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. आयसीसी चेअरमन असलेले श्रीनिवासन यांनी ठाकूर यांच्यावर सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिल्याचा आरोप करीत याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणी होईल. याशिवाय बीसीसीआयच्या मार्गदर्शन मागणाऱ्या याचिकेवरदेखील त्याचवेळी सुनावणी होईल. श्रीनिवासन गेल्या २८ आॅगस्टच्या बैठकीत उपस्थित झाल्याने बोर्डाची बैठक गुंडाळण्यात आली होती. दरम्यान, मनोहर यांना पूर्व विभागातील सर्व सहा संघटनांचा पाठिंबा आहे. बीसीसीआयच्या पोटनिवडणुकीमध्ये मनोहर यांना पूर्व विभागातून केवळ एका प्रस्तावकाची गरज होती, पण त्यांना सर्व सहा संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे मनोहर एकमेव उमेदवार आहेत.मनोहर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणाऱ्यांमध्ये दिवंगत दालमिया यांचा मुलगा अभिषेक याचाही समावेश आहे. रविवारी होणाऱ्या आमसभेच्या विशेष बैठकीमध्ये अभिषेक कौटुंबिक क्लब असलेल्या नॅशनल क्रिकेट क्लबचे (एनसीसी) प्रतिनिधित्व करणार आहे. या व्यतिरिक्त मनोहर यांचा नावाचा प्रस्ताव देणाऱ्यांमध्ये बंगाल क्रिकेट संघटनेचे सौरव गांगुली, त्रिपुराचे सौरव दासगुप्ता, आसामचे गौतम राय, ओडिशाचे आशीर्वाद बेहडा आणि झारखंडचे संजय सिंग यांचा समावेश आहे. पूर्व विभागाचे एक प्रतिनिधी म्हणाले, ‘‘पूर्व विभागातीय सर्व सहा संघटनांनी मनोहर यांच्या नावाचा वेगवेगळा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला सर्वांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध होते.’’ मनोहर यांनी यापूर्वी २००८-२००९ आणि २०१०-२०११ या तीन वर्षांच्या कालावधीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. मनोहर यांच्या नियुक्तीमुळे श्रीनिवासन यांचे बीसीसीआयमध्ये २०१७ पर्यंत पुनरागमन होण्याची शक्यता धुसर झाली आहे. २०१७ मध्ये मनोहर यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रमुख अजय शिर्के यांनी मनोहर या पदासाठी योग्य उमेदवार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये ३१ पैकी २९ संलग्न संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. राजस्थान क्रिकेट संघटना आणि जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटना यांना या बैठकीमध्ये सहभागी होण्याची मंजुरी नाही. दोन असोसिएट सदस्य छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटना आणि मणिपूर क्रिकेट संघटना रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. (वृत्तसंस्था)अ‍ॅड. शशांक मनोहर हे प्रसिद्ध वकील असून २००८ ते २०११ या काळात पहिल्यांदा बीसीसीआयचे २९ वे अध्यक्ष बनले. स्वच्छ प्रतिमा, वक्तशीरपणा आणि शिस्तप्रिय कामासाठी ते ओळखले जातात. बोर्डाला एक प्रामाणिक अध्यक्ष देऊ, असे बोर्डाचे सचिव ठाकूर यांनी म्हटले होतेच. शशांक मनोहर यांनी यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले असून, या पदासाठी ते सक्षम व्यक्ती आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी ते योग्यपणे सांभाळतील, असा मला विश्वास आहे.- सौरव गांगुलीअध्यक्षपदासाठी मनोहर योग्य उमेदवार आहेत. पूर्व विभागातील सर्व सहा संलग्न संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. ते अनुभवी व प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांची पार्श्वभूमी कायद्यासोबत जुळलेली असल्यामुळे सध्याच्या घडीला त्यांच्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार नाही.- अजय शिर्के