शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विस्कटलेली घडी बसविण्यासाठी मांडवली

By admin | Updated: December 20, 2014 22:34 IST

हेवेदावे आणि पदांच्या लालसेपोटी सुरू झालेल्या वादाने महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेवर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे.

स्वदेश घाणेकर - मालवणहेवेदावे आणि पदांच्या लालसेपोटी सुरू झालेल्या वादाने महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेवर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे. भारतीय जलतरण संघटनेच्या (एसएफआय) पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई करायला लावल्याचे सांगण्यात येते. त्याच पदाधिकाऱ्यांच्या मदतीने राज्य संघटनेची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाची पदे देऊन ‘मांडवली’ करण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याचे सूत्रांकडून कळते. राज्य संघटनेच्या निलंबनानंतर होत असलेल्या सिंधुदुर्ग सागरी जलतरण शर्यतीत सहभाग घेऊ नका, असा फतवा काढण्यात आला होता. मात्र, स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादामुळे हेच फतवा काढणारे हातमिळवणीसाठी पुढे सरसावले असल्याचे समजते आहे. गेली दहा वर्षे राज्य संघटनेने जमाखर्च न दाखविल्याचे कारण पुढे करत एसएफआयने निलंबनाची कारवाई केली आणि पुण्याचे अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या अस्थायी समितीची नेमणूक केली. या समितीने सिंधुदुर्ग जलतरण शर्यतीत सहभाग न घेण्याचा फतवा इतर जिल्हा संघटनांना दिला आणि तो न ऐकल्यास खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले. तसे पत्रही जिल्हा संघटनांना पाठविल्याचे या समितीमधील सदस्य प्रभाकर घरत यांनी सांगितले. ते म्हणाले, खेळाडूंचे नुकसान होऊ नये हे माझे मत असून तडजोडीसाठी तयारी आहे. मात्र, राज्य संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आमच्या तडजोडीच्या प्रस्तावाला त्यांनी दाद दिली नाही. मात्र, सिंधुदुर्गातील या शर्यतीला १८ संलग्न संघटनेच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून हा फतवा मान्य नसल्याचे दाखवून दिले.त्याचमुळे या समितीला आपले अस्तित्व नष्ट होण्याची भीती वाटू लागली आणि त्यांच्याकडून राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेचे सत्र सुरू झाले. माजी सचिव किशोर वैद्य यांनीही याला दुजोरा दिला असून येत्या दोन-तीन दिवसांत वाद मिटेल, अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, संघटनेवर निलंबनाची कारवाई होण्यापूर्वी या शर्यतीला राज्य संघटनेने मान्यता दिलेली होती. त्यावेळी मी सचिव पदावर कार्यरत होतो. त्यामुळे त्यांच्या या फतव्याला काहीच अर्थ राहत नाही. हा वाद मिटावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या दोन-तीन दिवसांत त्यात यश मिळेल. हा वाद लवकर मिटेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शानबाग यांनी व्यक्त केला आहे. येथील चिवला समुद्रात रविवारी पाचव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील जवळपास ११८४ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यात ८५० मुले, २९० मुली आणि ४४ अपंग खेळाडूंचा सहभाग आहे. रविवारी पहाटे ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. ५ कि.मी., ३ कि.मी., २ कि.मी., १ कि.मी. व ५०० मीटर या पाच गटात पार पडणार आहे. दरम्यान, सराव करताना नागपूर येथील १४ वर्षीय रिद्धी परमार या स्पर्धकाला समुद्री मासा चावल्याची घटना आज, शनिवारी सकाळी घडली.