शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

मालिका विजयाचे वेध

By admin | Updated: August 28, 2015 03:39 IST

श्रीलंकेविरुद्ध तिसरी आणि अखेरची कसोटी उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार असून २२ वर्षांत पहिल्यांदा

कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध तिसरी आणि अखेरची कसोटी उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार असून २२ वर्षांत पहिल्यांदा ही संधी चालून आली आहे. पी. सारा ओव्हलवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार या नात्याने कसोटी जिंकण्यात विराट कोहलीला पहिले यश मिळाले. कुमार संगकाराचा निरोपाचा हा सामना भारताने २७८ धावांनी जिंकला. भारताने लंकेत याआधी १९९३ साली कसोटी मालिका जिंकली होती. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने ती मालिका १-० ने खिशात घातली होती. पाच गोलंदाजांसह खेळण्याचे कोहलीचे डावपेच अलगद कामी आले. गाले येथे तीन फिरकी गोलंदाजांना आणि कोलंबोत हरभजनला विश्रांती देत स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली होती. हे गोलंदाज लंकेचे ४० गडी बाद करण्यात यशस्वी ठरले आहेत. आश्विनने आतापर्यंत १७ बळी घेतले. दोन्ही सामन्यांत जो नऊ दिवस खेळ झाला, त्यात आठ दिवस भारतीय संघाने वर्चस्व गाजविले. अमित मिश्राने १२ गडी बाद केले. वेगवान माऱ्यात ईशांत शर्मा आणि उमेश यादव हे देखील मागे नव्हते. भारताने फलंदाजी क्रमातही बदल केला. अजिंक्य रहाणे तिसऱ्या स्थानावर खेळायला आला, तर रोहित शर्माला पाचव्या स्थानावर खेळविण्यात आले. पाच गोलंदाजांचा प्रयोग झाल्याने चेतेश्वर पुजारा याला मधल्या फळीतही स्कोप नव्हता. मुरली विजय आणि शिखर धवन हे जखमी झाल्याने तिसऱ्या सामन्यात पुजारा-लोकेश राहुल सलामीला येतील. यामुळे नमन ओझा यालादेखील कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. करुण नायर याला मात्र बाहेर बसावे लागेल. दुसरीकडे कुमार संगकाराला विजयी निरोप देण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेल्याने लंका संघ निराश आहे. शिवाय संगकाराची उणीव भरून काढणारा फलंदाज शोधण्याची संघाला चिंता आहे. संगकाराऐवजी तिसऱ्या स्थानावर उपुल थरंगा याला बढती मिळेल. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज चौथ्या आणि लाहिरू थिरीमाने पाचव्या स्थानावर खेळायला येतील. रंगना हेरथला पूरक ठरणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या असल्याने चौथ्या दिवसापासून त्या फिरकीला योग्य ठरण्याची शक्यता असून, खेळपट्टी पाटा ठरते की अन्य खेळपट्ट्यांसारखी ही खेळपट्टीदेखील गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरेल याबद्दल पुढील पाच दिवसांत कळणार आहे. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, नमन ओझा, करुण नायर, रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन, स्टुअर्ट बिन्नी. श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कौशल सिल्व्हा, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चांदीमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कौशल परेरा, रंगना हेराथ, दिलरुवान परेरा, थारिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामीरा. हेड टू हेडभारत व श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत ३७ कसोटी सामने झाले़ यात भारताने १५ सामने जिंकले असून ७ सामने त्यांना पराभव पत्करावा लागला़ १५ सामने अनिर्णित राहिले़विराट कोहली आणि कंपनी तिसरी कसोटी जिंकण्याच्या तयारीत मैदानात उतरेल़ श्रीलंकेमध्ये २२ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचा त्यांचा इरादा राहील़भारताने लंकेत याआधी १९९३ साली कसोटी मालिका जिंकली होती. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने ती मालिका १-० ने खिशात घातली होती. तीन फिरकी गोलंदाजांना आणि कोलंबोत हरभजनला गाले येथे विश्रांती देत स्टुअर्ट बिन्नीला संधी देण्यात आली होती. हे गोलंदाज लंकेचे ४० गडी बाद करण्यात यशस्वी ठरले असून आश्विनचे आतापर्यंत १७ बळी झाले आहेत़संगकाराच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी भरण्यास वेळ लागेल; पण भारताविरुद्धच्या निर्णायक सामन्यात उपुल तरंगा ही उणीव दूर करण्यास सज्ज आहे. आमचा फलंदाजी क्रम अद्याप स्थिर नाही. चांगला क्रम तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसरा सामना यजमानांसाठी कठीण आहे. विकेटवर काही प्रमाणात गवत असल्याने आम्ही सकारात्मक खेळणार आहोत.- अँजेलो मॅथ्यूज, कर्णधार श्रीलंकाआमच्या गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत दोन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली. निर्णायक कसोटीतही या कामगिरीची पुनरावृत्ती होईल. फलंदाजी क्रम परिस्थितीनुसार बदलू. प्रत्येक फलंदाजासाठी संघात कुठली पोझिशन निश्चित आहे, हे पडताळून पाहू. विजयासाठी कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही. त्याच वेळी आत्मसंतुष्टदेखील राहणार नाही.-रवी शास्त्री, संचालक टीम इंडिया