शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
4
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
5
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
6
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
7
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
8
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
9
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
10
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
11
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
12
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
13
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
14
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
15
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
16
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
17
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
18
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
19
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
20
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा

मालिका आयोजनासाठी भारताच्या मागे धावणार नाही : पीसीबी

By admin | Updated: September 23, 2015 23:05 IST

आगामी डिसेंबर महिन्यात यूएईत द्विपक्षीय मालिका आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे वारंवार आग्रह धरला

कराची : आगामी डिसेंबर महिन्यात यूएईत द्विपक्षीय मालिका आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे वारंवार आग्रह धरला; पण यापुढे पीसीबी मुळीच आग्रह करणार नाही. चेंडू भारताच्या कोर्टात आहे. प्रस्तावित मालिकेचे भविष्य बीसीसीआयनेच ठरवावे, असे मत पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी बुधवारी नोंदविले.पत्रकारांशी बोलताना शहरयार म्हणाले, ‘माझ्या मते मालिका आयोजनासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. आता पुन्हा आग्रह करणार नाही. मालिकेचे भविष्य भारतानेच निश्चित करावे.’ आगामी मालिका आणि भारतासोबतचे संबंध याबाबत ते पुढे म्हणाले, ‘पीसीबीने मालिका खेळण्यासंदर्भात व द्विपक्षीय संबंध सुधारण्यास नेहमीच सकारात्मक वाव दिला. आम्ही याबाबत जे पत्र बीसीसीआयला दिले ते अद्याप त्यांच्या सरकारकडे पोहोचले नाही, हाचिंतेचा विषय ठरतो. भारताने मालिकेतून माघार घेतल्यास आम्ही आयसीसीशी संपर्क करू, तसेच अन्य बोर्डाच्या संपर्कात राहू. ही मालिका दोन्ही बोर्डांदरम्यानच्या परस्पर समझोत्याचा भाग आहे. दोन्ही बोर्डाच्या समझोत्यावर स्वाक्षऱ्या आहेत. गरज भासल्यास हा मुद्दा उपस्थित केला जाईल. क्रिकेट आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी असल्याचे पाकचे स्पष्ट मत आहे.’उभय देशांतील संबंध याआधीही तणावाचे राहिले, पण आम्ही क्रिकेट खेळत आलो असे नमूद करीत शहरयार पुढे म्हणाले, ‘भारतीय संघ आमच्याविरुद्ध २००७ मध्ये मात्र कसोटीमालिका खेळला नाही. आता आम्ही भारताच्या मागे धावणार नाही. भारताला आता निर्णय घ्यावा लागेल. द्विपक्षीय मालिका आयोजनाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. पाकने प्लान ‘ब’संदर्भात काम सुरू केले असून अद्याप त्यात यश आलेले नाही; कारण डिसेंबरमध्ये केवळ दोन संघ रिकामे आहेत. त्यापैकी एक संघ झिम्बाब्वे आहे. या संघासोबत आम्ही यंदा दोनदा मालिका खेळली. दुसरा संघ बांगला देश आहे. बांगला देश प्रीमियर लीगमध्ये व्यस्त असला तरी पर्याय खुले आहेत.’पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेदेखील भारतासोबत खेळणे ही केवळ पाकची गरज समजू नये. भारतालादेखील याची अधिक गरज असल्याचे वक्तव्य केले होते. शोएब म्हणाला,‘पाकला या मालिकेची गरज आहे असे मानू नये. भारतालादेखील आमच्या संघाविरुद्ध खेळायची इच्छा आहे. भारत-पाक मालिकेमुळे उभय बोर्डांना मोठा आर्थिक लाभ होईल. या लाभामुळे क्रिकेटच्या पायाभूत सुविधांकडे अधिक लक्ष देता येईल. भारत आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याची आम्हाला जाणीव आहे; पण पाकविरुद्ध खेळून बीसीसीआय आणखी जास्त कमाई करू शकते.’