शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मालिका खिशात

By admin | Updated: November 9, 2014 23:07 IST

भारताने श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या

हैदराबाद : उमेश यादव (४ बळी) व अक्षर पटेल (३ बळी) यांच्या अचूक माऱ्यानंतर शिखर धवन (९१ धावा, ७९ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) व विराट कोहली (५३ धावा, ४ चौकार, १ षटकार) यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने रविवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या तिसऱ्या लढतीत श्रीलंकेचा ६ गडी व ३५ चेंडू राखून पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजय आघाडी घेतली.भारताने श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन व अजिंक्य रहाणे (३१ धावा, ५ चौकार) यांनी सलामीला ६२ धावांची भागीदारी करीत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर धवनने अंबाती रायडूच्या (३५ धावा, ३ चौकार) दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करीत भारताच्या विजयाची मजबूत पायभरणी केली. रायडू धावबाद झाल्यानंतर धवनने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने धावफलक हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. शतकाकडे वाटचाल करणारा धवन चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. धवनविरुद्ध कुलसेकराच्या गोलंदाजीवर संगकाराने केलेले झेलबादचे अपील पंचानी उचलून धरले. रिल्पेमध्ये मात्र चेंडू हेल्मेटला चाटून गेल्याचे दिसत होते. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने अनुभवी सुरेश रैनाच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करीत विजय निश्चित केला. आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली बाद झाल्यानंतर रैनाने (नाबाद १८) वृद्धिमान साहाच्या (नाबाद ६) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, माहेला जयवर्धनेच्या (११८) शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४२ धावांची आव्हानात्मक मजल मारली.मालिकेत २-० ने पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जयवर्धनेच्या शतकी खेळीनंतरही श्रीलंकेचा डाव ४८.२ षटकांत २४२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेची सुरुवातीला २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर जयवर्धने (११८) आणि तिलकरत्ने दिलशान (५३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०५ भागीदारी करीत डाव सावरला. जयवर्धनेने १२४ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने ११८ धावांची खेळी केली. दिलशानने ८० चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावांचे योगदान दिले. माहेलाने सीकुगे प्रसन्नासोबत आठव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करीत श्रीलंकेला दोनशेचा पल्ला ओलांडून दिला. सुरुवातीला सुदैवी ठरलेल्या प्रसन्नाने २ चौकार व १ षटकार लगाविला. माहेला जयवर्धनेचा महत्त्वाचा बळी अश्विनने घेतला. प्रसन्नाला यादवने तंबूचा मार्ग दाखविला. श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (१०) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. भारतातर्फे उमेश यादवने ५३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले तर अक्षर पटेलने ४० धावांत ३ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला. यागदवने कुशल परेरा (४), कुमार संगकारा (०), थिसारा परेरा (१) आणि प्रसन्ना (२९) यांना बाद केले तर अक्षर पटेलने अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (१०), अशान प्रियंजन (२) आणि चतुरंगा डी सिल्वा (२) यांना माघारी परतवले. अंबाती रायडूने १६ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला. त्याने दिलशानला बाद केले. (वृत्तसंस्था)