शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आयओए नैतिक आयोग बरखास्त करण्याचा अध्यक्षांचा निर्णय महासचिवांनी ठरवला ‘अवैध’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 00:41 IST

बत्रा-मेहता यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ताणतणाव सुरू आहेत.

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि महासचिव राजीव मेहता यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अध्यक्षांनी नैतिक आयोग बरखास्त करण्याची घोषणा करताच महासचिवांनी ही कृती बेकायदेशीर असल्याचे सांगून आयोग कायम राहील, असे ठासून सांगितले.

बत्रा-मेहता यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ताणतणाव सुरू आहेत. ‘महासचिवांच्या अनेक जबाबदाऱ्या काढून घेण्यात येतील,’ असे बत्रा यांनी सांगताच मेहता यांनी त्यांना त्याच भाषेत उत्तर देत, आयओएचे दैनंदिन कामकाज पाहणे, माझीच जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. २०१७ ला न्या. व्ही. के. गुप्ता यांच्या नेतृत्वात आयओएने नैतिक आयोगाची स्थापना केली होती. आयोगाचा कार्यकाळ वाढविण्यावरून दोघांमधील संबंध विकोपाला गेल्याचे कळते.

मेहता यांनी कार्यसमिती सदस्य, राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य आॅलिम्पिक संघटनांना पत्र लिहून, ‘अध्यक्षांनी १९ मे रोजी पाठविलेल्या पत्रात आयओएचा नैतिक आयोग बरखास्त करण्याची कृती अवैध असून आयोग पूर्ववत ठेवण्यात येत असल्याचे’ कळविले आहे. आयओएच्या विधी विभागाचे चेअरमन या प्रकरणाचा तपास करतील, त्यानंतर कार्यसमितीच्या पुढील बैठकीत या मुद्यावर चर्चा होईल, असे मेहता यांनी पत्रात पुढे म्हटले आहे. आयओएच्या विधी विभागाचे चेअरमन ज्येष्ठ विधिज्ञ आर. के. आनंद हे आहेत.

डिसेंबर २०१७ ला आमसभेने अध्यक्ष आणि महासचिवांना आयोग तसेच विविध समित्यांचे चेअरमन, समन्वयक आणि सदस्यांची नेमणूक करण्याचे अधिकार दिले होते, असा मेहता यांचा दावा असून नव्या नियुक्त्या तसेच कुणाची उचलबांगडी करण्याचे अधिकार मात्र दिलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. नैतिक आयोग बरखास्त करण्याचे बत्रा यांंचे पत्र अर्थहीन असून सदस्यांनी या पत्राला गंभीरपणे घेऊ नये, असे त्यांनी सदस्यांना आवाहन केले. दुसरीकडे बत्रा यांनी हे पत्र प्रशासकीय कर्मचाऱ्यांना रेकॉर्डवर घेण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020