शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

भरत अरुणच्या नियुक्तीवर सौरव गांगुलीने बाळगले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 15:42 IST

भरत अरुण यांच्या करण्यात आलेल्या निवडीबाबत प्रतिक्रिया विचारली असता सौरव गांगुलीने मौन पाळणे पसंत केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सौरव गांगुली आणि रवी शास्त्रीमध्ये सुरू असलेल्या शितयुद्धात रवी शास्त्रीने आणलेल्या दबावासमोर झुकत बीसीसीआयने काल भरत अरुण यांची संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी वर्णी लावली होती. भरत अरुण यांच्या करण्यात आलेल्या निवडीबाबत प्रतिक्रिया विचारली असता सौरव गांगुलीने मौन पाळणे पसंत केले. 
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने केलेली शिफारस डावलून बीसीसीआयने भरत अरुण यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले होते. भरत अरुण यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा पाठिंबा होता. दरम्यान गांगुलीकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता तो म्हणाला, "याविषयी बरेच काही बोलून झाले आहे. आता मला याविषयी अजून काही बोलायचे नाही."
काही दिवसांपूर्वी क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक आणि राहुल द्रविडला फलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर झहीर खान वर्षातील 150 दिवस भारतीय संघाला मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले होते. पण बीसीसीआयने या दोघांच्याही नियुक्तीला स्थगिती दिली होती. भरताच्या या दोन माजी क्रिकेटपटूंच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले होते.  अधिक वाचा
(रवी शास्त्रींचा दबदबा ! भरत अरूण टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच )(हा तर द्रविड आणि झहीरचा सार्वजनिक अपमान - रामचंद्र गुहा )( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणी मान्य करताना बीसीसीआयने मंगळवारी भरत अरुण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली होती. त्यामुळे या पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. शास्त्री भारतीय संघाचे संचालक होते त्या वेळी अरुण गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी लवकरच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अरुण यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरला होता.  
अरुण यांना दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा निर्णय शास्त्री यांच्या प्रशासकांची समिती (सीओए) तसेच काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या मुलाखतीनंतर घेण्यात आला.