शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सायना, कश्यपच्या अडचणीत वाढ; विलगीकरण कक्षाची सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 01:40 IST

ऑलिम्पिक पात्रतेच्या प्रयत्नांना खीळ

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संदर्भात भारतीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमांमुळे भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप व सायना नेहवाल अडचणीत आले आहेत. दोघेही ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाले. मात्र त्यांना भारतात परत येणे कठीण झाले आहे.

कश्यप याने आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना ट्विटवर संदेश पाठवून आपली अडचण सांगितली आहे. त्याने म्हटले आहे की, ‘आम्ही बर्मिंगहममध्ये स्पर्धेत भाग घेण्यास आलो आहोत. तुम्ही लागू केलेल्या नव्या नियमामुळे आमची स्थिती खूपच कठीण झाली आहे. या संदर्भात आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे.’ असे त्याने या संदेशात म्हटले आहे. याचबरोबर त्याने सायना, किदाम्बी श्रीकांत, प्रणव चोप्रा, सिक्की रेड्डी यांची अडचण झाली असल्याचे म्हटले आहे.

बुधवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात नव्या सूचना जाहीर केल्या आहे. याअंतर्गत १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांतून येणाऱ्या किंवा या देशाला भेट देऊन आलेल्या भारतासह कोणत्याही देशाच्या नागरिकांना किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे.

या सर्व भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्पेनमधील बार्सिलोना ओपन स्पर्धेत फेब्रुवारीमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे भारतात येण्याबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. भारतात आाल्यास सायना व कश्यप यांना दोन आठवडे विलगीकरण कक्षात रहावे लागेल. यामुळे आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जबर फटका बसणार आहे. 

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल