शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सायना, कश्यपच्या अडचणीत वाढ; विलगीकरण कक्षाची सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 01:40 IST

ऑलिम्पिक पात्रतेच्या प्रयत्नांना खीळ

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संदर्भात भारतीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमांमुळे भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप व सायना नेहवाल अडचणीत आले आहेत. दोघेही ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाले. मात्र त्यांना भारतात परत येणे कठीण झाले आहे.

कश्यप याने आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना ट्विटवर संदेश पाठवून आपली अडचण सांगितली आहे. त्याने म्हटले आहे की, ‘आम्ही बर्मिंगहममध्ये स्पर्धेत भाग घेण्यास आलो आहोत. तुम्ही लागू केलेल्या नव्या नियमामुळे आमची स्थिती खूपच कठीण झाली आहे. या संदर्भात आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे.’ असे त्याने या संदेशात म्हटले आहे. याचबरोबर त्याने सायना, किदाम्बी श्रीकांत, प्रणव चोप्रा, सिक्की रेड्डी यांची अडचण झाली असल्याचे म्हटले आहे.

बुधवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात नव्या सूचना जाहीर केल्या आहे. याअंतर्गत १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांतून येणाऱ्या किंवा या देशाला भेट देऊन आलेल्या भारतासह कोणत्याही देशाच्या नागरिकांना किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे.

या सर्व भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्पेनमधील बार्सिलोना ओपन स्पर्धेत फेब्रुवारीमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे भारतात येण्याबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. भारतात आाल्यास सायना व कश्यप यांना दोन आठवडे विलगीकरण कक्षात रहावे लागेल. यामुळे आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जबर फटका बसणार आहे. 

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल