शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

साहा, अश्विन मालिकेचे मानकरी

By admin | Updated: August 24, 2016 04:17 IST

रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

पोर्ट आॅफ स्पेन : रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. यष्टिरक्षक साहा याने तळाच्या फळीत चांगली फलंदाजी केली. कोहली म्हणाला, ‘आमच्यासाठी हा चांगला दौरा ठरला. आम्ही काही विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो. तळाच्या फळीत खेळताना रिद्धिमान साहाची फलंदाजी व सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने दिलेले योगदान माझ्या दृष्टीने या मालिकेतील सकारात्मक बाब आहे.’कोहली म्हणाला, ‘आम्ही कामगिरीत आणखी सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत. भविष्यातही त्यात खंड पडणार नाही, अशी आशा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या बाबी अधिक महत्त्वाच्या आहेत. तळाच्या फळीकडून उल्लेखनीय योगदान मिळाले म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये संघ यशस्वी ठरतात. त्यामुळे या विभागात अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे.’ मालिकेत चांगल्या निकालाची अपेक्षा होती : अश्विनरविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकताना १७ बळीही घेतले. अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अश्विनला या मालिकेत यापेक्षा सरस निकालाची अपेक्षा होती. अश्विनने या मालिकेत दोन शतकाच्या मदतीने २३५ धावा फटकावल्या. डावात दोनदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेताना एकूण १७ विकेट घेतल्या. अश्विन कसोटी मालिकेत सहाव्यांदा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामनावीर पुरस्काराच्या शर्यतीत त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. अश्विन म्हणाला, ‘यासाठी विंडीजला थोडे श्रेय द्यावे लागले. भारताची आघाडीची फळी लवकर माघारी परतल्यामुळे मला शतक झळकावण्याची संधी व वेळ मिळाला. अनेक संघातील आघाडीचे खेळाडू शतके झळकावतात.’ >एका कसोटीने आकलन होणार नाहीजर पाकिस्तान जिंकला नसता आणि आमची यापूर्वीची लढत अनिर्णीत संपली असती तर क्रमवारीत फरक पडला असता. हे अल्प कालावधीसाठी आहे, याची कल्पना आहे. क्रमवारीत चांगली चुरस आहे. संघ म्हणून या मोसमानंतर आकलन करणार आहोत. केवळ एका कसोटीवरून संघाचे आकलन करता येणार नाही. - कोहली >सहाव्या क्रमांकावरील फलंदाजी स्वप्नवत‘मी कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. वैयक्तिक विचार करता शतकाच्या तुलनेत मला पाच बळी घेण्याचा आनंद अधिक मिळतो. कोलकाता आणि सेंट ल्युसिया येथे झळकावलेली शतके माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. मला या कामगिरीची अपेक्षा होती. दोन शतके ठोकण्यात यशस्वी ठरेल असे वाटत नसले तरी फलंदाजीमध्ये योगदान देणे महत्त्वाचे आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल, याची कल्पना नव्हती. मायदेशात दीड महिना कसून मेहनत घेतली. त्याचा लाभ झाला. - अश्विन