शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

साहा, अश्विन मालिकेचे मानकरी

By admin | Updated: August 24, 2016 04:17 IST

रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

पोर्ट आॅफ स्पेन : रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. यष्टिरक्षक साहा याने तळाच्या फळीत चांगली फलंदाजी केली. कोहली म्हणाला, ‘आमच्यासाठी हा चांगला दौरा ठरला. आम्ही काही विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो. तळाच्या फळीत खेळताना रिद्धिमान साहाची फलंदाजी व सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने दिलेले योगदान माझ्या दृष्टीने या मालिकेतील सकारात्मक बाब आहे.’कोहली म्हणाला, ‘आम्ही कामगिरीत आणखी सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत. भविष्यातही त्यात खंड पडणार नाही, अशी आशा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या बाबी अधिक महत्त्वाच्या आहेत. तळाच्या फळीकडून उल्लेखनीय योगदान मिळाले म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये संघ यशस्वी ठरतात. त्यामुळे या विभागात अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे.’ मालिकेत चांगल्या निकालाची अपेक्षा होती : अश्विनरविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकताना १७ बळीही घेतले. अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अश्विनला या मालिकेत यापेक्षा सरस निकालाची अपेक्षा होती. अश्विनने या मालिकेत दोन शतकाच्या मदतीने २३५ धावा फटकावल्या. डावात दोनदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेताना एकूण १७ विकेट घेतल्या. अश्विन कसोटी मालिकेत सहाव्यांदा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामनावीर पुरस्काराच्या शर्यतीत त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. अश्विन म्हणाला, ‘यासाठी विंडीजला थोडे श्रेय द्यावे लागले. भारताची आघाडीची फळी लवकर माघारी परतल्यामुळे मला शतक झळकावण्याची संधी व वेळ मिळाला. अनेक संघातील आघाडीचे खेळाडू शतके झळकावतात.’ >एका कसोटीने आकलन होणार नाहीजर पाकिस्तान जिंकला नसता आणि आमची यापूर्वीची लढत अनिर्णीत संपली असती तर क्रमवारीत फरक पडला असता. हे अल्प कालावधीसाठी आहे, याची कल्पना आहे. क्रमवारीत चांगली चुरस आहे. संघ म्हणून या मोसमानंतर आकलन करणार आहोत. केवळ एका कसोटीवरून संघाचे आकलन करता येणार नाही. - कोहली >सहाव्या क्रमांकावरील फलंदाजी स्वप्नवत‘मी कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. वैयक्तिक विचार करता शतकाच्या तुलनेत मला पाच बळी घेण्याचा आनंद अधिक मिळतो. कोलकाता आणि सेंट ल्युसिया येथे झळकावलेली शतके माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. मला या कामगिरीची अपेक्षा होती. दोन शतके ठोकण्यात यशस्वी ठरेल असे वाटत नसले तरी फलंदाजीमध्ये योगदान देणे महत्त्वाचे आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल, याची कल्पना नव्हती. मायदेशात दीड महिना कसून मेहनत घेतली. त्याचा लाभ झाला. - अश्विन