शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

धावपटू कविता राऊत अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; अखेर राज्यपालांचे दरवाजे ठोठावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 07:32 IST

सावरपाड्यातील आदिवासी कन्येने दीड दशकांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवला होता.

नाशिक  :  राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकासह थेट ऑलिम्पिकपर्यंत धडक देऊन नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या पदरी शासन दरबारी अद्यापच निराशा पडली आहे. सर्व प्रकारची पात्रता असूनही शासकीय सेवेत प्रथम श्रेणीच्या अधिकारी म्हणून नोकरी दिली जात नसल्याने कविताने अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन तिचे गाऱ्हाणे मांडले. 

सावरपाड्यातील आदिवासी कन्येने दीड दशकांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवला होता. २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कविताने रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याबद्दल कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. 

शैक्षणिक क्षेत्रांत इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात धावपटू कविता राऊत यांच्या संघर्षकथेचा प्रवास मांडण्यात आला आहे. २०१४ पासून वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नोकरी मिळावी, म्हणून कविता राऊतने अर्ज केला होता. कवितानंतर अर्ज केलेल्या काही खेळाडूंची वर्ग एकच्या पदावर नियुक्ती झाली. कविताला मात्र, अजूनही नोकरीची प्रतीक्षाच आहे. त्या पार्श्वभूमीवर नोकरीसंदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविता राऊतने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपुढे मांडली. 

राज्यपालांना भेटणं हा माझा शेवटचा पर्याय होता. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी येत आहेत. माझी फाइल तिथून पुढे सरकत नाही. २०१८ मध्ये ज्या ३३ खेळाडूंची यादी निघाली होती, त्यातही माझं नाव नव्हतं. ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी मला काम करायचं आहे. - कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी