शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

रोस्टन चेसच्या झुंजार शतकाने भारताची विजयाची संधी हुकली

By admin | Updated: August 4, 2016 08:53 IST

सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला.

ऑनलाइन लोकमतकिंगस्टन, दि. ४- सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला. चौथ्या दिवशी चार बाद ४८ अशी वेस्ट इंडिजची अवस्था करणा-या भारतीय गोलंदाजांनी पाचव्यादिवशी साफ निराशा केली. 

नाबाद १३७ धावांची खेळी करणारा रोस्टन चेस भारताच्या विजयाच्या मार्गात अडथळा बनला. त्यात थोडी मदत पावसाने केली. मात्र त्यामुळे रोस्टने जो झुंजार बाणा दाखवला त्याचे महत्व कमी होत नाही. भारताच्या विजयाच्या मार्गात 'दीवार' बनलेल्या या कामगिरीसाठी रोस्टला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 
 
त्याला ब्लॅकवूड (६३), डाऊरीच (७४) आणि होल्डर (६४) यांनी महत्वपूर्ण साथ दिली. चेसने पाचव्या विकेटसाठी ब्लॅकवूड बरोबर ९३, सहाव्या विकेटसाठी डाऊरीच बरोबर १४४ आणि होल्डर बरोबर नाबाद १०३ धावांची भागीदारी करुन विंडिजचा पराभव टाळला. भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. 
 
खरतर भारत सहज हा सामना जिंकेल अशा स्थितीत होता. भारताला मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १९६ धावात रोखल्यानंतर भारताने ३०४ धावांची आघाडी घेतली होती. पण भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. 
 
चौथ्या दिवशी शामीच्य धडाक्यापुढे यजमानांनी पहिल्या सत्रात १५.५ षटकांतच चार बळी गमावल्याने सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर डावाच्या पराभवाचे संकट ओढवले होते. ईशांत शर्मा (१/१९) आणि अमित मिश्रा (१/२१) यांनीही अचूक मारा करताना विंडीजला दबावाखाली ठेवले.
 
पहिल्या डावात यजमानांनी १९६ धावा केल्यानंतर भारताने ९ बाद ५०० धावांवर पहिला डाव घोषित करून सामन्यात वर्चस्व मिळवले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अखेरचे सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशीही पावसामुळे एक तास उशिराने खेळ सुरू झाला. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका (१) तिसऱ्याच षटकात ईशांतचा शिकार ठरल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास खेळ थांबल्यानंतर ब्रेथवेट आणि ब्रावो यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शमीने आखूड टप्प्याच्या चेंडूने ब्रावोला अडचणीत आणले.
 
१३व्या षटकात कर्णधार कोहलीने अमित मिश्राला गोलंदाजीला पाचारण केले. त्याने ब्रेथवेटचा बळी घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. यानंतर शमीने धोकादायक मार्लोन सॅम्युअल्स आणि ब्रावो यांना माघारी धाडून भारताचे वर्चस्व निर्माण केले होते.