शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रोस्टन चेसच्या झुंजार शतकाने भारताची विजयाची संधी हुकली

By admin | Updated: August 4, 2016 08:53 IST

सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला.

ऑनलाइन लोकमतकिंगस्टन, दि. ४- सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला. चौथ्या दिवशी चार बाद ४८ अशी वेस्ट इंडिजची अवस्था करणा-या भारतीय गोलंदाजांनी पाचव्यादिवशी साफ निराशा केली. 

नाबाद १३७ धावांची खेळी करणारा रोस्टन चेस भारताच्या विजयाच्या मार्गात अडथळा बनला. त्यात थोडी मदत पावसाने केली. मात्र त्यामुळे रोस्टने जो झुंजार बाणा दाखवला त्याचे महत्व कमी होत नाही. भारताच्या विजयाच्या मार्गात 'दीवार' बनलेल्या या कामगिरीसाठी रोस्टला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 
 
त्याला ब्लॅकवूड (६३), डाऊरीच (७४) आणि होल्डर (६४) यांनी महत्वपूर्ण साथ दिली. चेसने पाचव्या विकेटसाठी ब्लॅकवूड बरोबर ९३, सहाव्या विकेटसाठी डाऊरीच बरोबर १४४ आणि होल्डर बरोबर नाबाद १०३ धावांची भागीदारी करुन विंडिजचा पराभव टाळला. भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. 
 
खरतर भारत सहज हा सामना जिंकेल अशा स्थितीत होता. भारताला मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १९६ धावात रोखल्यानंतर भारताने ३०४ धावांची आघाडी घेतली होती. पण भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. 
 
चौथ्या दिवशी शामीच्य धडाक्यापुढे यजमानांनी पहिल्या सत्रात १५.५ षटकांतच चार बळी गमावल्याने सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर डावाच्या पराभवाचे संकट ओढवले होते. ईशांत शर्मा (१/१९) आणि अमित मिश्रा (१/२१) यांनीही अचूक मारा करताना विंडीजला दबावाखाली ठेवले.
 
पहिल्या डावात यजमानांनी १९६ धावा केल्यानंतर भारताने ९ बाद ५०० धावांवर पहिला डाव घोषित करून सामन्यात वर्चस्व मिळवले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अखेरचे सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशीही पावसामुळे एक तास उशिराने खेळ सुरू झाला. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका (१) तिसऱ्याच षटकात ईशांतचा शिकार ठरल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास खेळ थांबल्यानंतर ब्रेथवेट आणि ब्रावो यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शमीने आखूड टप्प्याच्या चेंडूने ब्रावोला अडचणीत आणले.
 
१३व्या षटकात कर्णधार कोहलीने अमित मिश्राला गोलंदाजीला पाचारण केले. त्याने ब्रेथवेटचा बळी घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. यानंतर शमीने धोकादायक मार्लोन सॅम्युअल्स आणि ब्रावो यांना माघारी धाडून भारताचे वर्चस्व निर्माण केले होते.