शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

रोस्टन चेसच्या झुंजार शतकाने भारताची विजयाची संधी हुकली

By admin | Updated: August 4, 2016 08:53 IST

सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला.

ऑनलाइन लोकमतकिंगस्टन, दि. ४- सबीना पार्क मैदानावर झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात रोस्टन चेसने झुंजार शतकी खेळी करुन भारताच्या विजयाचा घास हिरावून घेतला. चौथ्या दिवशी चार बाद ४८ अशी वेस्ट इंडिजची अवस्था करणा-या भारतीय गोलंदाजांनी पाचव्यादिवशी साफ निराशा केली. 

नाबाद १३७ धावांची खेळी करणारा रोस्टन चेस भारताच्या विजयाच्या मार्गात अडथळा बनला. त्यात थोडी मदत पावसाने केली. मात्र त्यामुळे रोस्टने जो झुंजार बाणा दाखवला त्याचे महत्व कमी होत नाही. भारताच्या विजयाच्या मार्गात 'दीवार' बनलेल्या या कामगिरीसाठी रोस्टला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 
 
त्याला ब्लॅकवूड (६३), डाऊरीच (७४) आणि होल्डर (६४) यांनी महत्वपूर्ण साथ दिली. चेसने पाचव्या विकेटसाठी ब्लॅकवूड बरोबर ९३, सहाव्या विकेटसाठी डाऊरीच बरोबर १४४ आणि होल्डर बरोबर नाबाद १०३ धावांची भागीदारी करुन विंडिजचा पराभव टाळला. भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. 
 
खरतर भारत सहज हा सामना जिंकेल अशा स्थितीत होता. भारताला मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १९६ धावात रोखल्यानंतर भारताने ३०४ धावांची आघाडी घेतली होती. पण भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. 
 
चौथ्या दिवशी शामीच्य धडाक्यापुढे यजमानांनी पहिल्या सत्रात १५.५ षटकांतच चार बळी गमावल्याने सलग दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर डावाच्या पराभवाचे संकट ओढवले होते. ईशांत शर्मा (१/१९) आणि अमित मिश्रा (१/२१) यांनीही अचूक मारा करताना विंडीजला दबावाखाली ठेवले.
 
पहिल्या डावात यजमानांनी १९६ धावा केल्यानंतर भारताने ९ बाद ५०० धावांवर पहिला डाव घोषित करून सामन्यात वर्चस्व मिळवले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी अखेरचे सत्र पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशीही पावसामुळे एक तास उशिराने खेळ सुरू झाला. सलामीवीर राजेंद्र चंद्रिका (१) तिसऱ्याच षटकात ईशांतचा शिकार ठरल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास खेळ थांबल्यानंतर ब्रेथवेट आणि ब्रावो यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शमीने आखूड टप्प्याच्या चेंडूने ब्रावोला अडचणीत आणले.
 
१३व्या षटकात कर्णधार कोहलीने अमित मिश्राला गोलंदाजीला पाचारण केले. त्याने ब्रेथवेटचा बळी घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. यानंतर शमीने धोकादायक मार्लोन सॅम्युअल्स आणि ब्रावो यांना माघारी धाडून भारताचे वर्चस्व निर्माण केले होते.