शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

दुष्काळाविषयी योग्य निर्णय देण्यात येईल : विराट कोहली

By admin | Updated: April 12, 2016 03:39 IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यावरून वाद सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही

बंगळुरू : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यावरून वाद सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही आपली प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा असून, या प्रकरणातील दोन संबंधित पक्ष संमजसपणे मार्ग काढतील, असे मत कोहलीने व्यक्त केले. कोहलीने यासंबंधी सांगितले, ‘‘जर यातून मार्ग काढण्यात आला, तर मला विश्वास आहे, की दोन्ही संबंधित पक्ष यातून पुढे जाण्याचा मार्ग काढतील. शिवाय, दोन्ही पक्ष दोन्ही बाजूंचा विचार करून सर्वश्रेष्ठ निर्णय घेतील.’’ त्याचप्रमाणे, ‘‘सध्या तरी ज्याप्रकारे आपल्याला चित्र दिसतेय, तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच मलाही अंतिम निर्णयाची उत्सुकता लागली आहे,’’ असेही कोहलीने सांगितले.आयपीएलदरम्यान खेळपट्टीवर पाणी वापरण्यात येत असल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकेनंतर महाराष्ट्रातील आयपीएल आयोजनावरून वाद निर्माण झाला होता. शिवाय, नुकतीच कर्नाटक उच्च न्यायालयातही याच प्रकारची याचिका एका पर्यावरण कार्यकर्त्याने सादर केली. याबाबतही कोहलीने निश्चितच सर्वोत्तम पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगितले. याविषयी कोहली वैयक्तिक मत देताना म्हणाला, ‘‘याप्रकरणी माझे मत महत्त्वाचे आहे, असे मला वाटत नाही. हे प्रकरण सोडवणे अधिकारी व उच्च पदावर बसलेल्यांवर अवलंबून आहे. ते नक्कीच यामध्ये योग्य निर्णय देतील.’’ (वृत्तसंस्था) राजकोटमधील आयपीएल सामन्याला भाजपाच्या माजी खासदारांचा विरोधराजकोट : भाजपाचे माजी खासदार सिद्धार्थ परमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दलित महासंघाच्या सदस्यांनी शहर आणि गुजरातच्या अन्य भागातील पाण्याची तीव्र टंचाई पाहता कांधेरी स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या आयोजनाला विरोध करताना येथे धरणे आंदोलन केले़ परमार आणि त्यांच्या समर्थकांनी येथे सिव्हिल हॉस्पिटल सर्कलवर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन केले़