शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब

By admin | Updated: February 21, 2015 02:30 IST

माझ्या मते १०-१२ दिवसांपूर्वी पाकिस्तानी तंबूत काही समस्या निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. काही सीनिअर खेळाडू व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रँट लुडेन यांच्यादरम्यान वाद झाल्याचे वृत्त आले होते.

माझ्या मते १०-१२ दिवसांपूर्वी पाकिस्तानी तंबूत काही समस्या निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. काही सीनिअर खेळाडू व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रँट लुडेन यांच्यादरम्यान वाद झाल्याचे वृत्त आले होते. पण, त्यानंतर या सर्व अडचणी सोडविण्यात यश आले. ही बाब आता समोर आल्यामुळे याची सांगड भारताविरुद्धच्या पराभवासोबत घालण्यात येत आहे; पण असे काहीच नाही, याची मी हमी देतो. माझा एकेकाळचा सहकारी वकार संघाचा मुख्य प्रशिक्षक असून, त्याच्याकडे जोखिमीचे काम आहे. संघाला पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी त्याला काही योजना आखावी लागणार आहे, पण खेळाडूंनीही काही रणनीती तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक वेळी प्रशिक्षकावर विसंबून राहू शकत नाही; कारण संघातील खेळाडू काही १५ वर्षांची मुले नाहीत.संघातील खेळाडूंसाठी १०.३० च्या आता घरात, ही योजना माझ्या आकलनापल्याड आहे. आपण २१ व्या शतकात वावरत असताना खेळाडूंवर कर्फ्यू लावणे चुकीचे आहे. इम्रान खान कर्णधार असताना आम्हाला कधीच अशा समस्येला सामोरे जावे लागले नाही. पाक संघाला आता वेस्ट इंडीजच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विंडीजविरुद्ध आयर्लंड संघाने ३०० पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. जेसन होल्डरला कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, याची मला चांगली कल्पना आहे. २४ व्या वर्षी कर्णधारपदाची जबाबदारी आणि सीनिअर खेळाडूंचे समर्थन नसणे, अशी परिस्थिती मी अनुभवली आहे. विंडीजचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा खेळाडू जगातील लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत आहेत. विंडीज निवड समितीने ड्वेन ब्राव्हो व किरोन पोलार्ड यांच्यासारख्या दोन दिग्गज खेळाडूंना बाहेरचा मार्ग दाखविला आहे. त्यामुळे संघाच्या निराशाजनक कामगिरीचा मार्ग निवड समितीनेच निश्चित केल्याचे दिसून येते. विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा दुसरी कुठली बाब महत्त्वाची नाही. पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळल्यामुळे मला जगात ओळख निर्माण करता आली. सचिन आज जे काही आहे ते केवळ भारतातर्फे क्रिकेट खेळल्यामुळे आहे. भारतीय संघाचा विचार करता आठवड्याअखेर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. अनेक जाणकार दक्षिण आफ्रिका संघाला विजयाचा दावेदार मानत आहे; पण माझ्या मते ही लढत चुरशीची होईल. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध भारतीय संघाला योजनाबद्ध फलंदाजी करावी लागेल. सलामीवीरांवर चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी राहणार आहे. १० षटकांत त्यांनी गडी न गमावता ४० धावाही फटकावल्या तरी ती वाईट कामगिरी ठरणार नाही. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तर धोनी व रैना यांना अखेर आक्रमक खेळी करण्याची संधी राहील. सलामीवीरांना कसोटीप्रमाणे सावध फलंदाजी करावी लागेल. भारतीय संघाला काही अडचण भासत असेल तर त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धची लढत बघावी. झिम्बाब्वेने त्या लढतीत सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवले होते. ही लढत सर्वंच संघांसाठी प्रेरणादायी ठरेल. दक्षिण आफ्रिका संघ बलाढ्य आहे; पण अपराजित नाही, हे झिम्बाब्वे संघाने सिद्ध केले आहे. (टीसीएम)