शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

रणजी स्पर्धेत मुंबईचा विजयी भांगडा

By admin | Updated: October 13, 2015 03:03 IST

अखिल हेरवाडकरने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. अखिलने चौथ्या दिवशी पंजाबच्या ६ फलंदाजांना बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुंबई : अखिल हेरवाडकरने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. अखिलने चौथ्या दिवशी पंजाबच्या ६ फलंदाजांना बाद करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एक डाव आणि १२ धावांनी पंजाब संघाला पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या डावात द्विशतक झळकवणाऱ्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. रणजी सामन्याच्या ग्रुप बी गटात मुंबईने ८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ग्रुप बी गटात मुंबईने दुसऱ्या लढतीत पहिल्या दिवसापासून दबदबा कायम ठेवला. विशेष म्हणजे, फलंदाजांनी चोख भूमिका पार पाडल्यानंतर मुंबईकरांच्या नजरा खिळल्या त्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे. ४ बाद २४४ अशा स्थितीत पंजाब संघ चौथ्या दिवशी मैदानात उतरला. मनदीप सिंग (११३) आणि हिमांशू चावला (४५)ने सुरुवातीला आक्रमक फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. अर्धशतकापासून केवळ ५ धावा दूर असताना बलविंदरच्या एका अप्रतिम चेंडूवर हिमांशू पायचित झाला. कर्णधार आदित्य तरेने अखिलच्या हाती चेंडू सोपवला आणि मुंबईने विजयाच्या दिशेने चाल केली. मनदीपने गीतांश खेराच्या साथीने डाव पुढे नेला. खेराने सुंदर फटकेबाजी करत ८६ धावांचे योगदान दिले. मात्र अखिलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिला बळी मिळवला. त्याने मनदीप (११६)ला मंगेलाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. परिणामी, पंजाबच्या शेवटच्या आशादायी जोडीला सुरुंग लावला. ६ बाद ३३८ अशी स्थिती असताना सिद्धार्थ कौल (९), सरबजीत लढ्ढा (०) १२ धावांच्या अंतराने बाद झाले. खेरा (८६) बाद होताच पंजाबची शेवटची आशा संपुष्टात आली. पंजाबची ९ बाद ३९८ अशी अवस्था झाली होती; तर मुंबईकडे अद्यापही १८ धावांची आघाडी होती. शेवटचा गडीदेखील अखिलने टिपला. बी. सरन (१५) जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नात असताना त्याने शार्दुलच्या हाती झेल दिला. अखेर ४०३ धावांवर पंजाबचा डाव संपुष्टात आला. या पराभावामुळे गुणतालिकेत पंजाबची चौथ्या स्थानावर घसरण झाली. सामन्यात विजयश्री मिळवून मुंबईचा संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला. पहिल्या डावात दमदार द्विशतक झळकावणारा मुंबईकर श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. तिसऱ्या सामन्यात मुंबईला तामिळनाडू संघाचे आव्हान असणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई : पहिला डाव ८ बाद ५६९ (घोषित )पंजाब : पहिला डाव सर्वबाद १५४ आणि दुसरा डाव सर्वबाद ४०३पंजाब (दुसरा डाव) : मनन वोहरा झे. तरे गो. ठाकूर ६, जीवनज्योत सिंग धावचित हरमित सिंग ९१, उदय कौल झे. मंगेला गो. हरमित सिंग २०, युवराज सिंग त्रिफळाचित हेरवाडकर १४, मनदीप सिंग झे. मंगेला गो. हेरवाडकर ११६, हिमांशू चावला पायचित संधू ४५, गीतांश खेरा झे. यादव गो. हेरवाडकर ८६, सिद्धार्थ कौल झे. मंगेला गो. हेरवाडकर ९, सरबजीत लढ्ढा पायचित हेरवाडकर ०, बी सरन झे. ठाकूर गो. हेरवाडकर ०, व्ही खन्ना नाबाद १. अवांतर - १, एकूण- १२७.२ षटकांत सर्वबाद ४०३ गोलंदाजी : धवल कुलकर्णी १९-४-६१-०; शार्दूल ठाकूर १७-१-७३-१; बलविंदर संधू २२-८-५६-१; अभिषेक नायर १३-१-३९-०; हरमित सिंग ३३-३-११७-१, अखिल हेरवाडकर २२.२-५-५२-६, सिद्धार्थ लाड १-०-५-०.