शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

रणजी अंतिम सामन्यात 'या' खेळाडूंनी केली कमाल

By admin | Updated: January 14, 2017 17:04 IST

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महत्वाची कामगिरी करणारे मुंबई आणि गुजरातचे खेळाडू.

ऑनलाइन लोकमत  

मुंबईने ठेवलेलं 312 धावाचं लक्ष्य पूर्ण करत गुजरातने एक नवा रेकॉर्ड केला आहे. इतकी मोठी धावसंख्या आतापर्यत तीन वेळाच पार करण्यात प्रतिस्पर्धी संघ यशस्वी ठरला होता. मुंबईने आतापर्यंत 40 वेळा रणजी जिंकला असून शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी त्यांच्याकडे होती. मात्र पार्थिव पटेलच्या खेळीपुढे मुंबईचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या मुंबई विरुद्धच्या अंतिम सामन्यात पार्थिव पटेलने दोन्ही डावात कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. पहिल्या डावात त्याने 90 तर दुस-या डावात 143 धावांची खेळी केली. त्यामुळे 83 वर्षात प्रथमच गुजरातला रणजी करंडक जिंकता आला. 

दुस-या डावात गुजरातच्या चिंतन गाजाने प्रभावी मारा करुन मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. दुस-या डावात हेरवाडकर, पृथ्वी शॉसह श्रेयस अय्यर या आघाडीच्या तीन फलंदाजांसह अन्य तीन फलंदाज असे मिळून त्याने एकूण सहा गडी बाद केले. अंतिम सामन्यात त्याने एकूण आठ विकेट मिळवल्या. 
 
पहिल्या डावात गुजरातने 100 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुस-या डावात गुजरातसमोर विजयासाठी मोठे लक्ष्य ठेवणे आवश्यक होते. त्यावेळी मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने 91 धावांची शानदार खेळी केली. दोन्ही डावात मिळून त्याने 126 धावा केल्या आणि 4 विकेट घेतल्या. 
 
मुंबईच्या शादुर्ल ठाकूरने दोन्ही डावात मिळून भेदक मारा केला. पहिल्या डावात त्याने गुजरातच्या 4 फलंदाजांना तंबुची वाट दाखवली. दुस-या डावात मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुका महाग पडल्या. अन्यथा त्याच्या खात्यात जास्त विकेट जमा झाल्या असत्या. त्याने दोन्ही डावात मिळून पाच गडी बाद केले. 
 
रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केल्यापासून दमदार फलंदाजी करणा-या  पृथ्वी शॉ ने अंतिम सामन्यातही चांगली कामगिरी केली. सलामीला येऊन शॉ ने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करताना 71 धावा केल्या. दुस-या डावात त्याने 44 धावा केल्या.