शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

नेमबाजी संघ निवड प्रक्रियेत हेराफेरी - राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:07 IST

१६ वर्षांचा आशियाई सुवर्ण विजेता सौरभ चौधरी याला वर्षभर राष्ट्रीय संघातून बाहेर बसावे लागले,’ असा दावा ज्युनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केला आहे.

नवी दिल्ली : ‘मर्जीतील खेळाडूला लाभ पोहोचविण्यासाठी निवड प्रक्रियेत मनमानी बदल केल्यामुळे १६ वर्षांचा आशियाई सुवर्ण विजेता सौरभ चौधरी याला वर्षभर राष्ट्रीय संघातून बाहेर बसावे लागले,’ असा दावा ज्युनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केला आहे.सौरभ हा मेरठजवळच्या कलिना गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने इंडोनेशियात नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेकवेळा आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन राहीलेल्या नेमबाजांना मागे टाकून सुवर्ण जिंकले. आशियाई स्पर्धेत देशासाठी सर्वांत लहान वयाचा तो सुवर्ण विजेता बनला.माजी नेमबाज जसपाल म्हणाले, ‘एनआरएआयमधील (राष्टÑीय रायफल महासंघ) काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वार्थासाठी निवड धोरणात बदल केल्यामुळे सौरभला वर्षभर बाहेर रहावे लागले.’ जसपाल पुढे म्हणाले, ‘सिनियर गटातही सौरभ देशाचा आघाडीचा नेमबाज होता.तो जितू रायच्या तुलनेत सरस होता.‘ग्रिप’योग्य नसल्याचे कारण देत एका स्पर्धेत सौरभला अपात्र ठरविण्यात आले. या प्रकरणी मला दखल द्यावी लागली. काही कोचेससोबत बोलणे झाल्यानंतर त्याची अपात्रता रद्द ठरविण्यात आली.’आशियाई स्पर्धेच्या चाचणीतही सौरभने जितूपेक्षा अधिक गुणांची कमाई केली होती. विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेत्या जितूला ‘आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’चे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंचे ‘टॅलेंट’ पैसा आणि प्रभाव या गोष्टींच्या आड दडपले जावू नये, असे माझे ठाम मत असल्याचे जसपाल म्हणाले. (वृत्तसंस्था)>युवा नेमबाजांना बराच पल्ला गाठायचा आहे. यश- अपयश, कटू अनुभव यातून जाताना युवा नेमबाज आणखी भक्कम होतील, असा विश्वास व्यक्त करीत राणा यांनी नेमबाजांच्या पालकांना खेळासाठी प्रोत्साहन देणे कायम ठेवावे, असे आवाहन केले. जसपाल यांनी मनू भाकर, अनीश भानवाला आणि सौरभ चौधरीसारख्या युवा नेमबाजांना विश्व स्तरावर पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.