शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळेच राहुलची निवड - कुंबळे

By admin | Updated: November 15, 2016 23:56 IST

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमधील प्रवेश निश्चित असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे

विशाखपट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमधील प्रवेश निश्चित असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले. यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अनुभवी गौतम गंभीरचे स्थान धोक्यात आले आहे.इंग्लंडच्या वेगवान व स्विंग माऱ्याविरुद्ध पहिल्या कसोटीत गौतम गंभीरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत राजस्थानविरुद्धच्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या के.एल. राहुलला सिनिअर राष्ट्रीय निवड समितीने पाचारण केले. कुंबळे म्हणाले,‘दुसऱ्या कसोटीला अद्याप दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राहुल निवडीसाठी उपलब्ध होता. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश राहणार असल्याचे निश्चित असल्यामुळेच त्याला पाचारण करण्यात आले आहे. कानपूर लढतीदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. तो दुखापतीतून सावरला असून प्रोटोकॉलनुसार त्याने रणजी लढतीत खेळत फिटनेस सिद्ध केला आहे. रणजी लढतीत त्याने पहिल्या डावात ७६ तर दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी तो फिट झाल्यामुळे आनंद झाला असून निवडीसाठी उपलब्ध असणे समाधानाची बाब आहे.’इंग्लंड संघात जिम्मी अँडरसनच्या पुनरागमनाच्या शक्यतेबाबत विचारले असता कुंबळे म्हणाले की, आम्ही कुणा एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करीत नाही. अँडरसनने ४५० बळी घेतले असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. तो यापूर्वीही येथे खेळलेला आहे. इंग्लंडसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तुम्हाला अनुभवाची गरज आहे आणि अशा खेळाडूच्या समावेशामुळे संघ मजबूत होतो. आम्ही इंग्लंडचा संघ म्हणून विचार करतो. कुणा एका विशिष्ट खेळाडूवर लक्ष केंद्रित करीत नाही.’ कुंबळे यांनी उमेश यादव व मोहम्मद शमी यांची प्रशंसा करताना सांगितले की, ‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. शमी व उमेश यांनी अचूक मारा करीत रिव्हर्स स्विंगने इंग्लंडला अडचणीत आणले. त्यांनी केवळ राजकोटमध्येच नाही तर न्यूझीलंडविरुद्धही चांगली गोलंदाजी केली. भुवीदेखील उल्लेखनीय ठरला.’भारताच्या क्षेत्ररक्षणाबाबत बोलताना प्रशिक्षक म्हणाले, ‘क्षेत्ररक्षणामुळे आम्ही निराश झालो. गेल्या साडेतीन महिन्यात खेळाच्या तिन्ही विभागामध्ये कामगिरी चांगली होती, पण आता कॅचिंगवर मेहनत घ्यावी लागेल.’ (वृत्तसंस्था)