शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळेच राहुलची निवड - कुंबळे

By admin | Updated: November 15, 2016 23:56 IST

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमधील प्रवेश निश्चित असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे

विशाखपट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमधील प्रवेश निश्चित असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले. यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अनुभवी गौतम गंभीरचे स्थान धोक्यात आले आहे.इंग्लंडच्या वेगवान व स्विंग माऱ्याविरुद्ध पहिल्या कसोटीत गौतम गंभीरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत राजस्थानविरुद्धच्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या के.एल. राहुलला सिनिअर राष्ट्रीय निवड समितीने पाचारण केले. कुंबळे म्हणाले,‘दुसऱ्या कसोटीला अद्याप दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राहुल निवडीसाठी उपलब्ध होता. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश राहणार असल्याचे निश्चित असल्यामुळेच त्याला पाचारण करण्यात आले आहे. कानपूर लढतीदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. तो दुखापतीतून सावरला असून प्रोटोकॉलनुसार त्याने रणजी लढतीत खेळत फिटनेस सिद्ध केला आहे. रणजी लढतीत त्याने पहिल्या डावात ७६ तर दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी तो फिट झाल्यामुळे आनंद झाला असून निवडीसाठी उपलब्ध असणे समाधानाची बाब आहे.’इंग्लंड संघात जिम्मी अँडरसनच्या पुनरागमनाच्या शक्यतेबाबत विचारले असता कुंबळे म्हणाले की, आम्ही कुणा एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करीत नाही. अँडरसनने ४५० बळी घेतले असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. तो यापूर्वीही येथे खेळलेला आहे. इंग्लंडसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तुम्हाला अनुभवाची गरज आहे आणि अशा खेळाडूच्या समावेशामुळे संघ मजबूत होतो. आम्ही इंग्लंडचा संघ म्हणून विचार करतो. कुणा एका विशिष्ट खेळाडूवर लक्ष केंद्रित करीत नाही.’ कुंबळे यांनी उमेश यादव व मोहम्मद शमी यांची प्रशंसा करताना सांगितले की, ‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. शमी व उमेश यांनी अचूक मारा करीत रिव्हर्स स्विंगने इंग्लंडला अडचणीत आणले. त्यांनी केवळ राजकोटमध्येच नाही तर न्यूझीलंडविरुद्धही चांगली गोलंदाजी केली. भुवीदेखील उल्लेखनीय ठरला.’भारताच्या क्षेत्ररक्षणाबाबत बोलताना प्रशिक्षक म्हणाले, ‘क्षेत्ररक्षणामुळे आम्ही निराश झालो. गेल्या साडेतीन महिन्यात खेळाच्या तिन्ही विभागामध्ये कामगिरी चांगली होती, पण आता कॅचिंगवर मेहनत घ्यावी लागेल.’ (वृत्तसंस्था)