शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

...त्यामुळेच राहुलची निवड - कुंबळे

By admin | Updated: November 15, 2016 23:56 IST

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमधील प्रवेश निश्चित असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे

विशाखपट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात के.एल. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमधील प्रवेश निश्चित असल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले. यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या अनुभवी गौतम गंभीरचे स्थान धोक्यात आले आहे.इंग्लंडच्या वेगवान व स्विंग माऱ्याविरुद्ध पहिल्या कसोटीत गौतम गंभीरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत राजस्थानविरुद्धच्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या के.एल. राहुलला सिनिअर राष्ट्रीय निवड समितीने पाचारण केले. कुंबळे म्हणाले,‘दुसऱ्या कसोटीला अद्याप दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राहुल निवडीसाठी उपलब्ध होता. राहुलचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश राहणार असल्याचे निश्चित असल्यामुळेच त्याला पाचारण करण्यात आले आहे. कानपूर लढतीदरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. तो दुखापतीतून सावरला असून प्रोटोकॉलनुसार त्याने रणजी लढतीत खेळत फिटनेस सिद्ध केला आहे. रणजी लढतीत त्याने पहिल्या डावात ७६ तर दुसऱ्या डावात १०६ धावांची खेळी केली. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी तो फिट झाल्यामुळे आनंद झाला असून निवडीसाठी उपलब्ध असणे समाधानाची बाब आहे.’इंग्लंड संघात जिम्मी अँडरसनच्या पुनरागमनाच्या शक्यतेबाबत विचारले असता कुंबळे म्हणाले की, आम्ही कुणा एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करीत नाही. अँडरसनने ४५० बळी घेतले असल्यामुळे त्याच्याकडे अनुभव आहे. तो यापूर्वीही येथे खेळलेला आहे. इंग्लंडसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तुम्हाला अनुभवाची गरज आहे आणि अशा खेळाडूच्या समावेशामुळे संघ मजबूत होतो. आम्ही इंग्लंडचा संघ म्हणून विचार करतो. कुणा एका विशिष्ट खेळाडूवर लक्ष केंद्रित करीत नाही.’ कुंबळे यांनी उमेश यादव व मोहम्मद शमी यांची प्रशंसा करताना सांगितले की, ‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. शमी व उमेश यांनी अचूक मारा करीत रिव्हर्स स्विंगने इंग्लंडला अडचणीत आणले. त्यांनी केवळ राजकोटमध्येच नाही तर न्यूझीलंडविरुद्धही चांगली गोलंदाजी केली. भुवीदेखील उल्लेखनीय ठरला.’भारताच्या क्षेत्ररक्षणाबाबत बोलताना प्रशिक्षक म्हणाले, ‘क्षेत्ररक्षणामुळे आम्ही निराश झालो. गेल्या साडेतीन महिन्यात खेळाच्या तिन्ही विभागामध्ये कामगिरी चांगली होती, पण आता कॅचिंगवर मेहनत घ्यावी लागेल.’ (वृत्तसंस्था)