शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

विंडिज दौऱ्यात रहाणे उपकर्णधार : कसोटी संघात मुंबईकर शार्दुल ठाकूरचा समावेश

By admin | Updated: May 23, 2016 20:38 IST

युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपविण्यात आली आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे

एमएस धोनीकडे युवा संघाचे नेतृत्व मुंबई : आगामी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपविण्यात आली आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी भारताच्या कसोटी संघात मुंबई रणजी संघाचा प्रमुखे वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हा एकमेव नवा चेहरा असेल. सोमवारी मुंबईत दोन्ही दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विदर्भचा युवा फलंदाज फैझ फझलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे. तर मुंबईकर शार्दुलला विंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. जून महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर जुलै - आॅगस्ट महिन्यात टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास जाईल.राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे सचिव अजय शिर्के यांनी निवड समितीच्या बैठकीनंतर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची घोषणा केली. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला असून एकदिवसीय व टी२० मालिकेसाठी एकच संघ ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे विंडिज दौऱ्यासाठी १७ सदस्यांचा भारतीय संघ निवडण्यात आला आहे. विशेष म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या प्रमुख फलंदाजांना झिम्बाब्वे दौऱ्याकरीता विश्रांती देण्यात आली आहे.फैझ फझल, युजवेंद्र चहल आणि जयंत यादव हे मर्यादित षटकांच्या संघात नवीन चेहरे असून टी२० विश्वचषक संघातील खेळाडू आणि यंदाच्या आयपीएलमध्ये साडेआठ करोडची मोठी किंमत मिळवणाऱ्या पवन नेगीला मात्र टी२० संघातून बाहेर करण्यात आले आहे. ......................................यंदाच्या मोसमात भारतीय संघाला एकूण १७ कसोटी सामने खेळायचे असून निवडकर्त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या आणि उमेश यादव यांना झिम्बाब्वे दौऱ्याकरीता विश्रांती दिली आहे. मागील दोन झिम्बावे दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र यावेळी त्याच्याकडे कर्णधारपद असून या दौऱ्यानंतर टीम इंडिया कसोटी सामन्यांत व्यस्त होणार असल्याने धोनीला यादरम्यान मोठी विश्रांती मिळणार आहे. ..............................................मर्यादित षटकांच्या संघात लेग स्पिनर युजवेंद्र चहल, आॅफ स्पिनर जयंत यादव, फैज फझल, मनदीप सिंग आणि करुण नायर यांचा समावेश आहे. तसेच पवन नेगी, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांना टी२० संघातून तर गुरकीरत सिंगला मागील एकदिवसीय संघातून वगळण्यात आले........................................यंदाच्या आयपीएलमध्ये छाप पाडलेला युझवेंद्र १९ बळींसह अग्रस्थानी आहे. त्याने रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडून यंदा ११ सामने खेळले आहेत. त्याने एकूण ७७ टी२० सामन्यांत ८० बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे सध्या आयपीएलशी निगडीत नसलेला फैझ एकमात्र खेळाडू संघात आहे. फैझने २०११ पर्यंत राजस्था रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. सध्या तो इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत आहे. ........................................जुलै - आॅगस्ट महिन्यात विंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात मुंबईकर शार्दुल एकमेव नवा चेहरा आहे. या दौऱ्याकरीता रहाणेला उपकर्णधारपदी निवडण्यात आले असून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे मार्च २०१५ पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता........................................शार्दुलने सलग दोन रणजी मोसमात चमकदार कामगिरीसह सर्वांचे लक्ष वेधले. २०१४-१५ साली त्याने ४८ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले होते. तर यानंतर २०१५-१६ मोसमात शादुलने ४१ बळी घेत मुंबईला ४१व्यांदा रणजी चॅम्पियन बनविण्यात मोलाचे योगदान दिले. शार्दुलने ३७ प्रथम श्रेणी सामन्यांत १३३ बळी मिळवले आहेत. ..........................................निवडण्यात आलेले भारतीय संघ :झिम्बाब्वे दौरा (एमदिवसीय व टी२०) : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), लोकेश राहूल, फैझ फझल, मनीष पांड्ये, करुण नायर, अंबाती रायडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनाडकट आणि युजवेंद्र चहल.वेस्ट इंडिज दौरा (कसोटी) : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहूल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, अमित मिश्रा आणि स्टुअर्ट बिन्नी......................................संघ निवडताना निवड समितीने निष्पक्षपातीपणे आपला निर्णय दिला. कोणीही समितीला खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत सूचविले नव्हते. त्याचबरोबर कोणत्याही खेळाडूने बोर्डाला आपल्या उपलब्धतेविषयी कोणत्याही प्रकारे कळवले नव्हते. झिम्बाब्वे आणि विंडिज दौऱ्यासाठी युवा संघ निवडण्यामागे निवड समितीचा स्वत:चा निर्णय होता. धोनी स्वत: युवा खेळाडूंसह झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यास इच्छुक होता. अशावेळी धोनीच्या उपस्थितीमध्ये युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी असेल. त्यांना धोनीच्या नेतृत्त्वाचा आणि अनुभवाचा मोठा फायदा होईल.- संदीप पाटील, राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष....................................काही वर्षांपुर्वी मी रणजी मोसमात ७०० हून अधिक धावा काढल्या होत्या. त्यावेळी मला काही खूशखबरींची अपेक्षा होती. मात्र असे काहीही झाले नाही आणि मी निराश झालो. मागील काही वर्षांपासून मी अपेक्षा सोडली होती. आज जेव्हा मला वडिलांनी फोन करुन ही आनंदाची बातमी कळवली तेव्हापासून आजूबाजूचे जग खूप सुंदर दिसत आहे. प्रत्येकजण भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहतो, पण प्रत्येकालाच ही संधी मिळत नाही. ही संधी मला मिळाल्याचा आनंद आहे. उशीरा का होईना, पण संधी तर मिळाली. अंतिम एकादशमध्ये खेळण्यास मिळाले तर या संधीचे सोने करेल.- फैझ फझल.........................................