शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही

By admin | Updated: November 17, 2015 03:10 IST

पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पीसीबीला भारतात मालिका खेळण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पीसीबीला पत्र लिहून पाकिस्तानला डिसेंबर महिन्यात भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमंत्रण दिले आहे, असे शहरयार खान यांनी सांगितले. शहरयार म्हणाले, ‘भारताने यूएईमध्ये खेळण्याची तयारी दर्शविली तरच मालिका शक्य आहे. लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान संघ मायदेशातील मालिका यूएईमध्ये खेळत आहे.’उभय देशांच्या बोर्डांदरम्यान झालेल्या करारानुसार पाकिस्तानला दोन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपद भूषवायचे आहे. आता मालिकेसाठी केवळ महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. कारण भारतीय संघ १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ८ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियाला जाणार आहे. भारतात द्विपक्षीय मालिकेचा अंतिम निर्णय सरकावर अवलंबून असतो. त्याप्रमाणे पीसीबीविरुद्धच्या प्रस्तावित मालिकेच्या अंतिम निर्णयासाठी सरकारच्या मंजुरीची गरज आहे. (वृत्तसंस्था)भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यूएईमध्ये न खेळण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. त्या कारणाची मला अद्याप प्रतीक्षा आहे. आम्ही २००७ व २०१२मध्ये भारत दौऱ्यावर गेलो होतो. या वेळी पुन्हा तसे होणार नाही. ही आमची मालिका असून आम्ही आमच्या स्थळांवर (यूएई) सामने खेळू. यूएईमध्ये खेळण्यास कुठली अडचण आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या काही सामन्यांचे यूएईमध्ये आयोजन केले होते, मग पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्यास कुठली अडचण आहे. - शहरयार खान