शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही

By admin | Updated: November 17, 2015 03:10 IST

पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळणे सयुक्तिक ठरणार नाही, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पीसीबीला भारतात मालिका खेळण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पीसीबीला पत्र लिहून पाकिस्तानला डिसेंबर महिन्यात भारतात प्रस्तावित द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमंत्रण दिले आहे, असे शहरयार खान यांनी सांगितले. शहरयार म्हणाले, ‘भारताने यूएईमध्ये खेळण्याची तयारी दर्शविली तरच मालिका शक्य आहे. लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान संघ मायदेशातील मालिका यूएईमध्ये खेळत आहे.’उभय देशांच्या बोर्डांदरम्यान झालेल्या करारानुसार पाकिस्तानला दोन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपद भूषवायचे आहे. आता मालिकेसाठी केवळ महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. कारण भारतीय संघ १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ८ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियाला जाणार आहे. भारतात द्विपक्षीय मालिकेचा अंतिम निर्णय सरकावर अवलंबून असतो. त्याप्रमाणे पीसीबीविरुद्धच्या प्रस्तावित मालिकेच्या अंतिम निर्णयासाठी सरकारच्या मंजुरीची गरज आहे. (वृत्तसंस्था)भारतात खेळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यूएईमध्ये न खेळण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. त्या कारणाची मला अद्याप प्रतीक्षा आहे. आम्ही २००७ व २०१२मध्ये भारत दौऱ्यावर गेलो होतो. या वेळी पुन्हा तसे होणार नाही. ही आमची मालिका असून आम्ही आमच्या स्थळांवर (यूएई) सामने खेळू. यूएईमध्ये खेळण्यास कुठली अडचण आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या काही सामन्यांचे यूएईमध्ये आयोजन केले होते, मग पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्यास कुठली अडचण आहे. - शहरयार खान