शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पाकविरुद्ध खेळणे हे अन्य संघाविरुद्ध खेळण्यासारखेच - विराट कोहली

By admin | Updated: May 25, 2017 01:24 IST

पाकविरुद्ध खेळणे हे अन्य संघाविरुद्ध खेळण्यासारखेच असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नोंदविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याआधी कुठलाही गवगवा झाला, तरी आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पाकविरुद्ध खेळणे हे अन्य संघाविरुद्ध खेळण्यासारखेच असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नोंदविले आहे. खेळाडूंसाठी हा ‘केवळ क्रिकेटचा एक सामना’ असेल असे कोहली म्हणाला.गत चॅम्पियन भारताला ४ जून रोजी बर्मिंगहॅम येथे पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना खेळायचा आहे. उभय देशांमध्ये राजकीय संबंध सध्या विकोपाला गेले आहेत. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध खेळणे योग्य आहे काय, असा प्रश्न करताच कोहली म्हणाला, ‘तुम्ही काय विचार करता. तुम्ही आधीपासून डोक्यात दुसराच विचार घेऊन आला आहात, असे वाटते. एक क्रिकेटपटू या नात्याने सध्याच्या परिस्थितीत जे चालले आहे त्याकडेच लक्ष देणे गरजेचे असते. दुसऱ्या टोकावर उभा असलेल्या सहकाऱ्याबाबतही विचार करायला वेळ नसतो. आम्ही केवळ क्रिकेट खेळाबाबतच विचार करतो. भारत-पाक ही लढत चाहत्यांसाठी नेहमी रोमहर्षकतेचा विषय ठरली आहे. चाहत्यांसाठी उभय देशातील सामना काहीही असून शकतो, पण आमच्यासाठी मात्र हा एक क्रिकेट सामनाच आहे. आमच्या डोक्यात अन्य कुठलाही विचार येत नाही. अन्य संघांविरुद्ध खेळतो तसाच खेळ पाकविरुद्धही होईल. पाकविरुद्ध खेळण्याची ही काही पहिली वेळ नाही. पाकविरुद्ध खेळताना अतिरिक्त कुठलीही प्रेरणा लागत नाही.’ विश्वचषक टी-२० आणि वन डे विश्वचषकात भारताचे पाकवर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. भारतीय संघ पाकच्या तुलनेत ११-० ने पुढे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मात्र पाकिस्तानचा रेकॉर्ड भारताच्या तुलनेत सरस आहे. अपयश जीवन-मरणाचा प्रश्न का होतो?उपखंडातील खेळाडूंसाठी एका मालिकेत अपयशी होणे जीवनमरणाचा प्रश्न का बनते? मी कधीही स्वत:ला सिध्द करण्यासाठी खेळत नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रीया भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. ‘माझ्या मते प्रत्येक मालिकेमध्ये एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही उभारता. अनेकदा आमच्या आसपासचे वातावरण असे बनते की कोणतीही मालिका आमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनते. खास करुन उपखंडातील खेळाडूंबाबत असे होते आणि असे का होते हे मला समजत नाही.’ असे कोहलीने म्हटले. त्याचप्रमाणे, ‘जर खेळाडू भारतात चांगला खेळला नाही तर, फारकाही टीका होत नाही. परंतु, भारताबाहेर खेळाडू अपयशी ठरला, तर त्याच्या गळ्यावर तलवार लटकली जाते. मी यावर विश्वास ठेवत नाही. मी काही सिध्द करण्यासाठी खेळत नाही. देशासाठी सामना जिंकणे, हेच माझे एकमेव लक्ष्य असते,’ असेही कोहलीने सांगितले. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान नव्या आयुधांचा वापर : आर. आश्विनइंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेदरम्यान फिरकीत नव्या आयुधांचा वापर करणार असल्याचे संकेत दोन महिन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर ताजातवाना झालेला भारतीय संघाचा आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने दिले आहेत. स्थानिक सत्रात १३ कसोटी सामने खेळणाऱ्या आश्विनला आयपीएलदरम्यान विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.