शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खेळाडूंना येताहेत ‘अच्छे दिन’; साहित्यासाठी शासनाकडून मिळतेय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:15 IST

- पंकज रोडेकर । खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम ...

- पंकज रोडेकर ।खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम कामगिरी करून पदकांची लयलूट केली. त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातील खेळांडूच्या वतीने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी स्रेहल साळुंखे-कुदळे यांच्याशी साधलेला संवाद...

खेलो इंडियामध्ये ठाण्याचे किती योगदान होते ?

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघातून ठाणे जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी वैयक्तिक आणि सांघिक खेळ-खेळताना आपले विशेष योगदान दिले आहे. नुकतीच ही स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारांत पार पडली आहे. त्यात इतर जिल्ह्यांपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार खेळ करून महाराष्ट्राचा दरारा दाखवून दिला आहे.खेलो इंडियामधील पदकविजेत्यांचा सत्कार झाला का ?

मुळात ही स्पर्धा २६ जानेवारी रोजी खºया अर्थाने संपली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील पदके जिंकणाºया खेळाडूंचा सत्कार ठाण्यात झालेला नाही. त्या खेळाडूंच्या सत्काराबाबत क्रीडा विभागाकडून कळवल्यावर त्यानुसार, त्यांचा सत्कार केला जाईल. गतवर्षी खेलो इंडिया ही स्पर्धा बालेवाडीत झाल्याने त्यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला होता.

भविष्यात खेळांबाबत काही विशेष नियोजन आहे का?

विशेष असे काही नियोजन नाही. पण, पाच टक्के कोट्यातून खेळाडूंसाठी नोकरीमध्ये आरक्षण आहे. त्यातच, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होत आहे. तर ग्रामपंचायत स्तरावर व्यायामशाळा सुरू करणाºया संस्थांना शासन साहित्यासाठी सात लाख देते. तर, खेळाडूंना शिष्यवृत्तीस्वरूपात पाच हजार, १० हजार अशी रक्कमही मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यात मैदाने कमी होत आहेत?

ठाण्यात तशी परिस्थिती नाही. परंतु, मुंबईत आहे. क ल्याण आणि त्याच्या पुढील पट्ट्यात कबड्डी, खो-खो हे खेळ खेळले जात आहेत. उल्हासनगर येथे नेमबाजी, ठाण्यात व इतर ठिकाणी जलतरण, पॉवरलिफ्टिंग हे खेळ शालेयस्तरावर खेळले जात आहेत. त्यातून नवीन खेळाडू निश्चितच घडतील.

खेळांमध्ये करिअर आहे का ?

मी स्वत: खेळाडू आहे. खेळातून मी या पदापर्यंत पोहोचले आहे. सद्य:स्थितीत खेळ कमी झाले आहे. त्यातच, पालकवर्ग खेळांमध्ये नोकरी नाही, करिअर नाही असे म्हणतात. मात्र, खेळांना आता चांगले दिवस येत आहेत. खेळाकडे १०० टक्के वेळ दिला नाहीतर किमान ७५ टक्के तो दिल्यास नक्की चांगले दिवस येतील. त्यातून करिअरही घडू शकेल. जसे आयपीएल आणि प्रो-कबड्डी स्पर्धा यांचे उदाहरण देता येईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार