शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

खेळाडूंना येताहेत ‘अच्छे दिन’; साहित्यासाठी शासनाकडून मिळतेय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 01:15 IST

- पंकज रोडेकर । खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम ...

- पंकज रोडेकर ।खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम कामगिरी करून पदकांची लयलूट केली. त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातील खेळांडूच्या वतीने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी स्रेहल साळुंखे-कुदळे यांच्याशी साधलेला संवाद...

खेलो इंडियामध्ये ठाण्याचे किती योगदान होते ?

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघातून ठाणे जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी वैयक्तिक आणि सांघिक खेळ-खेळताना आपले विशेष योगदान दिले आहे. नुकतीच ही स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारांत पार पडली आहे. त्यात इतर जिल्ह्यांपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार खेळ करून महाराष्ट्राचा दरारा दाखवून दिला आहे.खेलो इंडियामधील पदकविजेत्यांचा सत्कार झाला का ?

मुळात ही स्पर्धा २६ जानेवारी रोजी खºया अर्थाने संपली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील पदके जिंकणाºया खेळाडूंचा सत्कार ठाण्यात झालेला नाही. त्या खेळाडूंच्या सत्काराबाबत क्रीडा विभागाकडून कळवल्यावर त्यानुसार, त्यांचा सत्कार केला जाईल. गतवर्षी खेलो इंडिया ही स्पर्धा बालेवाडीत झाल्याने त्यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला होता.

भविष्यात खेळांबाबत काही विशेष नियोजन आहे का?

विशेष असे काही नियोजन नाही. पण, पाच टक्के कोट्यातून खेळाडूंसाठी नोकरीमध्ये आरक्षण आहे. त्यातच, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होत आहे. तर ग्रामपंचायत स्तरावर व्यायामशाळा सुरू करणाºया संस्थांना शासन साहित्यासाठी सात लाख देते. तर, खेळाडूंना शिष्यवृत्तीस्वरूपात पाच हजार, १० हजार अशी रक्कमही मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यात मैदाने कमी होत आहेत?

ठाण्यात तशी परिस्थिती नाही. परंतु, मुंबईत आहे. क ल्याण आणि त्याच्या पुढील पट्ट्यात कबड्डी, खो-खो हे खेळ खेळले जात आहेत. उल्हासनगर येथे नेमबाजी, ठाण्यात व इतर ठिकाणी जलतरण, पॉवरलिफ्टिंग हे खेळ शालेयस्तरावर खेळले जात आहेत. त्यातून नवीन खेळाडू निश्चितच घडतील.

खेळांमध्ये करिअर आहे का ?

मी स्वत: खेळाडू आहे. खेळातून मी या पदापर्यंत पोहोचले आहे. सद्य:स्थितीत खेळ कमी झाले आहे. त्यातच, पालकवर्ग खेळांमध्ये नोकरी नाही, करिअर नाही असे म्हणतात. मात्र, खेळांना आता चांगले दिवस येत आहेत. खेळाकडे १०० टक्के वेळ दिला नाहीतर किमान ७५ टक्के तो दिल्यास नक्की चांगले दिवस येतील. त्यातून करिअरही घडू शकेल. जसे आयपीएल आणि प्रो-कबड्डी स्पर्धा यांचे उदाहरण देता येईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार