शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

खेलो इंडिया २०२० : ‘आसाम सुरक्षित! कोणतीही चिंता नको’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 2:43 AM

यजमानपदासाठी आसाम सरकार सज्ज

- रोहित नाईकगुवाहाटी : काही दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध गुवाहाटीत तीव्र निदर्शने झाली होती. यादरम्यान शहरामध्ये कर्फ्यूही लावण्यात आला होता; मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून स्पर्धेदरम्यान कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही खेलो इंडिया यूथ गेम्सचे सीईओ अविनाश जोशी यांनी ‘लोकमत’कडे दिली.९ ते २२ जानेवारीदरम्यान गुवाहाटी येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष असून गतविजेता महाराष्ट्र या वेळी आपल्या सांघिक जेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, आसाममधील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून येथे येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला कोणताही त्रास होणार नसल्याचे आसाम सरकारने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जोशी म्हणाले, ‘नक्कीच काही दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये तणावपूर्ण स्थिती होती, परंतु आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. खेळाडूंच्या वास्तव्याच्या ठिकाणी व स्पर्धा ठिकाणी कडक सुरक्षा असेल. याशिवाय खेळाडूंच्या प्रवास मार्गावर व वाहनांमध्येही सुरक्षा रक्षक तैनात असतील. त्यामुळे गुवाहाटी पूर्णपणे सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेतली आहे.’गुवाहाटीला क्रीडा राजधानी बनविण्याचे ध्येय असल्याचे सांगताना मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचे यजमानपद गुवाहाटीला मिळाल्याचा आनंद आहे. आसामसाठी ही मोठी संधी असून गुवाहाटी शहराला क्रीडा राजधानी बनविण्याचे आमचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे, ‘यंदा खेलो इंडिया स्पर्धेत विविध खेळांसह संपूर्ण भारताचे सांस्कृतिक दर्शनही घडेल,’ असा विश्वासही सोनोवाल यांनी व्यक्त केला.आसाममध्ये क्रीडा वातावरण तयार करण्यावर भर असल्याचे सांगताना सोनोवाल म्हणाले, ‘हिमा दास आसामची शान आहे. तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक युवा खेळांकडे वळू लागले. यासाठी आम्ही राज्यात क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत तिरंदाजी, फुटबॉल यांसारख्या विविध खेळांचे विशेष विद्यालयही उभारण्यात येईल. याशिवाय यंदाच्या स्पर्धेत खेळांसोबतच सांस्कृतिक दर्शनही घडविण्यात येईल.’देशाच्या संस्कृतीचे घडणार दर्शनस्पर्धेदरम्यान आसामसोबत प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन होईल. यासाठी आयोजकांनी प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक विभागाशी संपर्क केला आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशाची संस्कृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळेल. त्याचप्रमाणे काही खेळाडू सांस्कृतिक कला सादर करण्यास उत्सुक असल्यास त्यांनाही आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तीन दिवसांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदाच्या स्पर्धेत अनोखे आकर्षण ठरेल.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019