शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

एका रात्रीत चित्र बदलले

By admin | Updated: March 7, 2017 00:50 IST

मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता

हर्षा भोगले लिहितो..मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता, ‘तुम्ही आम्हाला बच्चे समजले होते, पण तुम्ही तर मायदेशातच कमकुवत भासत आहात, खरे आहे ना हे?’ भारतीय संघाला अनपेक्षित कोनातून आपल्याच बॉक्सिंग ग्लव्हजमधून ठोशे स्वीकारावे लागले. चॅम्पियन्स संघ निमूटपणे हे सहन करीत असल्याचे चित्र दिसले. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला काय घडले हे मला माहीत नाही. याची माहिती घेण्यासाठी माशी बनून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील भिंतीवर बसायला मला आवडले असते. एका रात्रीत भारतीय संघाचे रूप पालटले. चवताळलेला भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर चालून गेला. त्यामुळे उभय संघांदरम्यान कसोटी खेळाची रंगत अनुभवाला मिळाली. तिसऱ्या दिवशी तर भारतीय संघाने काही अंशी वर्चस्वही मिळवले. सध्या यार्ड पुढे आहे असे म्हणण्यापेक्षा इंचभर पुढे आहे, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. भारताने चाहत्यांसह आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वत:ला लढवय्या संघ असल्याचे दाखवून दिले. लोकेश राहुल दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध केलेले आहे. कुठल्याही खेळाडूसाठी फलंदाजीला खडतर असलेल्या या खेळपट्टीवर या तिन्ही क्रिकेटपटूंनी शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी अविश्वसनीय भासत आहे. भारतात मात्र हे घडत असते. या खेळपट्टीवर फलंदाजांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक आहे. येथे १८०-२०० धावांचे लक्ष्य पुरेसे नाही. भारताला येथे ३००च्या जवळपास धावांच्या लक्ष्याची गरज आहे. त्यासाठी खेळपट्टीवर असलेल्या पुजारा व रहाणे यांच्या व्यतिरिक्त करुण नायर याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करणाऱ्या नॅथन लियोनचा मारा खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ३०० धावांचे लक्ष्य असले म्हणजे कोहली आणि आश्विनला संयम बाळगता येईल. कमी धावसंख्येचे लक्ष्य असेल तर त्यांच्यावर मर्यादा येईल. संयम बाळगला तर अनुकूल निकाल मिळवता येतात आणि घाई केली तर चूक होण्याची शक्यता असते. पुजारा व रहाणे लढवय्ये फलंदाज आहेत. कारकिर्दीत त्यांनी बरेचदा अशी कामगिरी केली आहे. मंगळवारी त्यात जर ते यशस्वी ठरले तर ही मालिका पुणे सोडल्यानंतर भासली होती त्यापेक्षा नक्कीच वेगळी भासेल. (पीएमजी)