शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत चित्र बदलले

By admin | Updated: March 7, 2017 00:50 IST

मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता

हर्षा भोगले लिहितो..मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता, ‘तुम्ही आम्हाला बच्चे समजले होते, पण तुम्ही तर मायदेशातच कमकुवत भासत आहात, खरे आहे ना हे?’ भारतीय संघाला अनपेक्षित कोनातून आपल्याच बॉक्सिंग ग्लव्हजमधून ठोशे स्वीकारावे लागले. चॅम्पियन्स संघ निमूटपणे हे सहन करीत असल्याचे चित्र दिसले. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला काय घडले हे मला माहीत नाही. याची माहिती घेण्यासाठी माशी बनून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील भिंतीवर बसायला मला आवडले असते. एका रात्रीत भारतीय संघाचे रूप पालटले. चवताळलेला भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर चालून गेला. त्यामुळे उभय संघांदरम्यान कसोटी खेळाची रंगत अनुभवाला मिळाली. तिसऱ्या दिवशी तर भारतीय संघाने काही अंशी वर्चस्वही मिळवले. सध्या यार्ड पुढे आहे असे म्हणण्यापेक्षा इंचभर पुढे आहे, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. भारताने चाहत्यांसह आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वत:ला लढवय्या संघ असल्याचे दाखवून दिले. लोकेश राहुल दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध केलेले आहे. कुठल्याही खेळाडूसाठी फलंदाजीला खडतर असलेल्या या खेळपट्टीवर या तिन्ही क्रिकेटपटूंनी शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी अविश्वसनीय भासत आहे. भारतात मात्र हे घडत असते. या खेळपट्टीवर फलंदाजांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक आहे. येथे १८०-२०० धावांचे लक्ष्य पुरेसे नाही. भारताला येथे ३००च्या जवळपास धावांच्या लक्ष्याची गरज आहे. त्यासाठी खेळपट्टीवर असलेल्या पुजारा व रहाणे यांच्या व्यतिरिक्त करुण नायर याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करणाऱ्या नॅथन लियोनचा मारा खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ३०० धावांचे लक्ष्य असले म्हणजे कोहली आणि आश्विनला संयम बाळगता येईल. कमी धावसंख्येचे लक्ष्य असेल तर त्यांच्यावर मर्यादा येईल. संयम बाळगला तर अनुकूल निकाल मिळवता येतात आणि घाई केली तर चूक होण्याची शक्यता असते. पुजारा व रहाणे लढवय्ये फलंदाज आहेत. कारकिर्दीत त्यांनी बरेचदा अशी कामगिरी केली आहे. मंगळवारी त्यात जर ते यशस्वी ठरले तर ही मालिका पुणे सोडल्यानंतर भासली होती त्यापेक्षा नक्कीच वेगळी भासेल. (पीएमजी)