शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहील : मुदगल

By admin | Updated: July 15, 2015 01:28 IST

लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांना निलंबित केल्यामुळे ‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत

नवी दिल्ली : लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांना निलंबित केल्यामुळे ‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत आयपीएलमधील सट्टेबाजीच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष मुकुल मुदगल यांनी व्यक्त केले.ही अत्यंत कठोर शिक्षा आहे. यामुळे आयपीएल, बीसीसीआय व खेळाडूंवर चांगला प्रभाव पडेल. अनेक लोकांना वाटते की, यामुळे खेळावर विपरीत परिणाम होईल. मात्र, हा तात्पुरता धक्का असेल, असे मला वाटते. यामुळे क्रिकेटची प्रतिमा उजाळेल व लोकांचा आयपीएलवरील विश्वास कायम राहील.- मुकुल मुदगलजर बीसीसीआयने यापूर्वीच जर कठोर कारवाई केली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. बीसीसीआयने संथगतीने ही कारवाई केली. हे प्रकरण न्यायालयात जाईल असे त्यांना वाटले नसावे. यातून आपण काही शिकायला हवे.- निरंजन शाह, बीसीसीआयचे माजी सचिव बीसीसीआयमधील कोणीही चुकीच्या कामाबद्दल आवाज उठवला नाही. सर्व प्रकारचे नियम अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांना काही व्यक्तिंसाठी बदलण्यात आले. मला वाटते आयपीएल सुरू राहिले पाहिजे. मात्र, बीसीसीआयने आयपीएलपासून दूर राहिले पाहिजे. आयपीएलची जबाबदारी एका वेगळ्या संस्थेकडे द्यायला हवी- ए. सी. मुथय्या, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष या दोन्ही संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयावर मी सहमत नाही. गुरुनाथ मय्यप्पन व राज कुंद्रा दोषी ठरले होते. संपूर्ण संघ फिक्सिंगमध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण संघ अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी नसतो तोपर्यंत संपूर्ण संघावर अशी कारवाई कशी करता येईल. संपूर्ण आयपीएलसाठी हा निर्णय निराशाजनक असेल असे मला वाटते.’- आर्यमा सुंदरम, बीसीसीआयचे वकीलबीसीसीआयने मयप्पनचे सासरे आयसीसीचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगायला हवे. चेन्नई सुपरकिंग्ज व मयप्पन यांना वाचवण्यासाठी श्रीनिवासनच जबाबदार आहेत. बीसीसीआयने त्यावेळीच त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती व त्यांचे आयसीसीचे नामांकन रद्द करायला हवे होते. श्रीनिवासन यांना आयसीसीच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही.- इंद्रजित बिंद्रा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ‘आयसीसी’चे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करू नये तसेच बीसीसीआयने आयसीसीच्या प्रतिनिधित्वाचे त्यांचे नामांकन रद्द करावे.- आदित्य वर्माक्रिकेटवरील क्रिकेटप्रेमींचा विश्वास कायम राहण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला हवे.- संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटू न्या. लोढा समितीच्या निकालामुळे स्वच्छ हवा आली आहे. मात्र, अजून खूप गोष्टी शिल्लक आहेत.- बिशनसिंग बेदीक्रिकेटमध्ये भ्रष्टाचार सुरूझाला आहे. ही खूपच खेदजनक बाब आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी ही दु:खद बाब आहे. - सय्यद किरमाणी