शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

भारत-पाक हॉकी मालिका सुरू करा : पाक कोच

By admin | Updated: June 10, 2015 01:24 IST

भारत-पाकदरम्यान क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी उभय देशांतील क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू असतानाच आता दोन्ही देशांत हॉकी मालिका पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे.

नवी दिल्ली : भारत-पाकदरम्यान क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी उभय देशांतील क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू असतानाच आता दोन्ही देशांत हॉकी मालिका पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे. पाक हॉकी संघाचे मुख्य कोच शहनाझ शेख यांनी आशियाई हॉकी वाचविण्यासाठी ही मालिका सुरू होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बेल्जियममधील एंटवर्प येथे २० जूनपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या सेमिफायनलच्या तयारीत व्यस्त असलेले शेख इस्लामाबाद येथून वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, ‘‘भारत-पाक हॉकी मालिका पूर्ववत न झाल्यास आशियाई हॉकी संपून जाईल. आमचे खेळाडू शैलीदार खेळण्याऐवजी क्लिनिकल हॉकीवर भर देतील.’’ भारत आणि पाक संघ विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत अ गटात आहेत. याच गटात आॅस्ट्रेलिया, फ्रान्स आणि पोलंडचा समावेश आहे. भारत-पाक सामना २६ जून रोजी खेळला जाईल. या सामन्यात पाक संघ भारतावर मात करेल, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला. भुवनेश्वर येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात पाकने भारताला ४-३ ने पराभूत केले होते. पाकसाठी ६८ सामन्यांत ४५ गोल नोंदविणारे दोन वेळेचे आॅलिम्पियन शेख पुढे म्हणाले, ‘‘आधुनिक हॉकीतील आघाडीच्या दहा संघांच्या खेळात फारसा फरक नाही. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत भारताला धूळ चारली. या वेळीदेखील आमची तयारी भक्कम आहे; पण सामन्याच्या दिवशी होणाऱ्या कामगिरीवर विजयाचे समीकरण विसंबून असते.’’आॅस्ट्रेलियात पाकने चार देशांच्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दहा दिवसांचा कोरियाचा दौरा केला. ५ जूनपासून संघाचे इस्लामाबाद येथे तयारी शिबिर सुरू झाले. वर्षभरापूर्वी पाक संघाचे कोच बनलेले शेख पुढे म्हणाले, ‘‘अलीकडे आम्ही फार चांगली हॉकी खेळलो. पूर्वी प्रतिस्पर्धी हॉकी खेळणे कठीण झाले होते. सध्या पेनल्टी कॉर्नर ही संघाच्या जमेची बाजू ठरली आहे. आधुनिक हॉकीत पेनल्टी कॉर्नरचे विशेष महत्त्व असून, आमच्या संघात चार पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ आहेत. आम्ही शूटआऊटवरदेखील कठोर मेहनत घेत असल्यामुळे कनव्हर्शन रेट चांगला आहे.’’ पाकचा संघ ११ जून रोजी निवडला जाईल. १५ जून रोजी हा संघ स्पर्धास्थळी रवाना होणार आहे. (वृत्तसंस्था)