शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी

By admin | Updated: June 19, 2017 01:09 IST

अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.

लंडन : गोलंदाजांच्या सुमार कामगिरीनंतर कागदावर बलाढ्य भासणारे भारतीय फलंदाज मोक्याच्या क्षणी ढेपाळले आणि रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाकडून भारताला १८० धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानने साखळी फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध तिसऱ्यांदा विजय मिळविला. दोन लढतींमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. पाक संघ प्रथमच चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ठरला.फखर झमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४ बाद ३३८ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव ३०.३ षटकांत १५८ धावांत गुंडाळला. भारतीय डावात हार्दिक पांड्याचा (७६ धावा, ४३ चेंडू, ४ चौकार, ६ षट्कार) अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तिसऱ्याच चेंडूवर मोहम्मद आमिरने रोहित शर्माला (०) खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतवले. सुदैवी ठरलेल्या कोहलीला (५) पुढच्याच चेंडूवर आमिरने तंबूचा मार्ग दाखवीत भारताची २ बाद ६ अशी अवस्था केली. त्यानंतर आमिरने शिखर धवनचा (२१) अडथळा दूर करीत भारताची आघाडीची फळी कापून काढली. एकवेळ भारताची ६ बाद ७२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करीत रंगत निर्माण केली. आक्रमक अर्धशतकी खेळी करणारा पांड्या धावबाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडगडला. पाकिस्तानतर्फे आमिर व हसन अली यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. शादाब खानने दोन तर जुनेद खानने एक बळी घेत त्यांना योग्य साथ दिली. तत्पूर्वी, फखर झमानने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत आकर्षक शतकी खेळी केली. पाकिस्तानने भारताच्या सुमार गोलंदाजी व ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा लाभ घेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत रविवारी ४ बाद ३३८ धावांची दमदार मजल मारली. फखर झमानने १०६ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व ३ षट्कारांच्या मदतीने ११४ धावांची खेळी केली. त्याने अझहर अलीसोबत (५९) सलामीला १२८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद हफीज (नबााद ५७), बाबर आजम (४६) आणि इमाद वसीम (नाबाद २५) यांचे योगदानही उल्लेखनीय ठरले. भारतीय गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यात काही अंशी यशस्वी ठरला. त्याने ४४ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला. रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह यांची कामगिरी निराशाजनक ठरली. अश्विनने १० षटकांत ७०, तर बुमराहने ९ षटकांत ६८ धावा बहाल केल्या. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला यश मिळाले नाही. भारताला चौथ्या षटकात यश मिळाले होते. बुमराहच्या गोलंदाजीवर फखर झमानने धोनीच्या हातील झेल दिला, पण पंचानी नो-बॉलसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. रिप्लेमध्ये बुमराहचा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले. झमान ३ धावांवर तंबूत परतणार होता, पण त्यानंतर त्याने १११ धावांची भर घातली. त्याच्या खेळीने समीकरण बदलले. पाकची कमकुवत भासणारी फलंदाजी मजबूत भासायला लागली. झमानला अझहरची योग्य साथ लाभली. भुवनेश्वरने एका टोकाकडून दडपण कायम राखले, पण बुमराहचा आत्मविश्वास ढासळला. त्याच्या स्थानी आठव्या षटकात अश्विनकडे चेंडू सोपविण्यात आला, पण त्यालाही प्रभाव दाखविता आला नाही. जडेजानेही निराश केले.दरम्यान, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अझहर धावबाद झाला आणि भारताला पहिले यश मिळाले. अझहरने ७१ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व १ षटकार लगावला. त्यानंतर जमानने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने जडेजाच्या एका षटकात दोन चौकार व एक षटकार वसूल केला तर त्यानंतर अश्विनच्या षटकात एक चौकार व एक षटकार लगावला. अश्विनच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका लगावत त्याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धेतील अंतिम लढतीत पाकिस्तानच्या फलंदाजाने झळकावलेले हे पहिले शतक ठरले. जमानला पांड्याने माघारी परतवले. शोएब मलिकाला (१२) मोठी खेळी करता आली नाही. कोहलीने या लढतीत गोलंदाजीमध्ये सातत्याने बदल केले. जडेजा अपयशी ठरल्यामुळे जाधवला गोलंदाजीसाठी पाचारण केले. जाधवने आजमला बाद केले. (वृत्तसंस्था)धावफलकपाकिस्तान : अझहर अली धावबाद ५९, फखर झमान झे. जडेजा गो. पांड्या ११४, बाबर आजम झे. युवराज गो. जाधव ४६, शोएब मलिक झे. जाधव गो. भुवनेश्वर १२, मोहम्मद हफीज नाबाद ५७, इमाद वसीम नाबाद २५. अवांतर (२५). एकूण ५० षटकांत ४ बाद ३३८. बाद क्रम : १-१२८, २-२००, ३-२४७, ४-२६७. गोलंदाजी : भुवनेश्वर १०-२-४४-१, बुमराह ९-०-६८-०, अश्विन १०-०-७०-०, पांड्या १०-०-५३-१, जडेजा ८-०-६७-०, जाधव ३-०-२७-१. भारत : रोहित शर्मा पायचित गो. आमिर ००, शिखर धवन झे. सरफराज गो. आमिर २१, विराट कोहली झे. शादाब खान गो. आमिर ०५, युवराज सिंग पायचित गो. शादाब खान २२, महेंद्रसिंग धोनी झे. इमाद वसीम गो. अली ०४, केदार जाधव झे. सरफराज गो. शादाब खान ०९, हार्दिक पांड्या धावबाद ७६, रवींद्र जडेजा झे. बाबर गो. जुनेद १५, आर. अश्विन झे. सरफराज गो. हसन ०१, भुवनेश्वर कुमार नाबाद ०१, जसप्रीत बुमराह झे. सरफराज गो. अली ०१. अवांतर (३). एकूण ३०.३ षटकांत सर्वबाद १५८. बाद क्रम : १-०, २-६, ३-३३, ४-५४, ५-५४, ६-७२, ७-१५२, ८-१५६, ९-१५६, १०-१५८. गोलंदाजी : मोहम्मद आमिर ६-२-१६-३, जुनेद खान ६-१-२०-१, मोहम्मद हफीज १-०-१३-०, हसन अली ६.३-१-१९-३, शादाब खान ७-०-६०-२, इमाद वसीम ०.३-०-३-०, फखर झमान ३.३-०-२५-०.