शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात ‘नो चेंज’

By admin | Updated: February 15, 2017 00:41 IST

आगामी २३ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुध्दच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून

मुंबई : आगामी २३ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुध्दच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून राष्ट्रीय निवडकर्त्यांनी संघात कोणताही बदल केलेला नाही. नुकताच झालेल्या एकमेव कसोटीत बांगलादेशला नमवणारा भारतीय संघ आॅस्टे्रलियाविरुध्दच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी कायम ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी, अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्र दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. बांगलादेशविरुध्दही तो खेळला नव्हता, तर त्याच्या जागी पर्याय म्हणून कुलदीप यादवची संघात वर्णी लागली होती. मिश्रा अजूनही दुखापतीतून सावरलेला नसून एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने यादवचा समावेश असलेला १६ सदस्यांचा भारतीय संघ कायम ठेवला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील संघात स्थान मिळालेले नाही. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो जवळजवळ तंदुरुस्त झालेला होता. परंतु, यानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच, अजिंक्य रहाणे, जयंद यादव आणि हार्दिक पांड्या यांनी आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. मुरली विजय आणि केएल राहुल या सलामीवीरांकडून भारताला भक्कम सुरुवातीची अपेक्षा असेल. विजयने आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले असले, तरी राहुलला मात्र बांगलादेशविरुद्ध आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्याच्यावर विशेष जबाबदारी असेल. त्याचप्रमाणे, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासह मुंबईकर रहाणे व यष्टीरक्षक रिध्दिमान साहा यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजा या स्टार अष्टपैलू खेळाडूंवरही भारताची मुख्य मदार असेल. दोघांचाही फिरकी मारा कागारुंना लोळवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. तसेच, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या त्रयीकडे वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. (क्रीडा प्रतिनिधी)या मालिकेतील पहिला कसोटी सामना पुण्यामध्ये २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.बंगळुरु येथे ४ ते ८ मार्च दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळविण्यात येईल. यानंतर मालिकेतील अखेरचे दोन कसोटी सामने रांची (१६ - २० मार्च) आणि धर्मशाळा (२५-२९ मार्च) येथे खेळविण्यात येतील.पहिल्या दोन कसोटीसाठी संघविराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिध्दिमान साहा, रविचंद्रम आश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंद यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद आणि हार्दिक पांड्या.