शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार खेळी

By admin | Updated: August 20, 2016 01:10 IST

भारत - वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसाचा व्यत्यत कायम राहिला. सुरुवातीपासूनच मैदान ओलसर राहिल्याने दुसऱ्या

पोर्ट आॅफ स्पेन : भारत - वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसाचा व्यत्यत कायम राहिला. सुरुवातीपासूनच मैदान ओलसर राहिल्याने दुसऱ्या दिवशी विश्रांतीपर्यंत एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. यजमान विंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. मात्र, इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी मोक्याच्यावेळी घेतलेल्या प्रत्येकी एका बळीने पहिल्या दिवशी विश्रांतीपर्यंत यजमानांनी २ बाद ६२ धावा अशी मजल मारली होती. यावेळी सुरु झालेल्या पावसामुळे पुढे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. तर, दुसऱ्या दिवशी ओलसर मैदानामुळे खेळाला प्रारंभ झाला नाही.पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (नाबाद ३२) आणि अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स (नाबाद ४) खेळपट्टीवर टिकून होते. विशेष म्हणजे श्रीलंकेने बलाढ्य आॅस्टे्रलियाला दिलेल्या ३-० अशा व्हाइटवॉश नंतर आॅसी संघाने आयसीसी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावले. याचा फायदा टीम इंडियाने घेत अग्रस्थानी झेप घेतली. मात्र, आपले हेच अग्रस्थान कायम राखण्यासाठी भारताला विंडिजविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजय अनिवार्य आहे. परंतु, पावसाने केलेल्या व्यत्ययामुळे भारतापुढे विजयाचे आव्हान कठिण झाले आहे. तिसऱ्या कसोटीतही संपुर्ण एक दिवस पावसामुळे धुऊन गेल्यानंतरही भारताने गोलंदाजांच्या जोरावर बाजी मारताना चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. याच सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आता भारतापुढे आहे. (वृत्तसंस्था)धावफलक :वेस्ट इंडिज (पहिला डाव) : क्रेग ब्रेथवेट खेळत आहे ३२, लिआॅन जॉन्सन झे. रोहित गो. इशांत ९, डॅरेन ब्रावो त्रि. गो. अश्विन १०, मार्लेन सॅम्युअल्स खेळत आहे ४. अवांतर - ७. एकूण : २२ षटकात २ बाद ६२ धावा.गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-१-१३-०; मोहम्मद शमी ६-२-१४-०; इशांत शर्मा ५-३-७-१; रविचंद्रन अश्विन ५-१-२२-१.