शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

वर्ल्डकपमुळे टीम इंडियात संचारला नवा उत्साह

By admin | Updated: February 26, 2015 00:56 IST

मी गेल्या काही वर्षांत खूप क्रिकेट पाहिले. भारतीय चाहत्यांना विदेशात आपल्या संघाला प्रोत्साहन देतानादेखील पाहिले; पण रविवारी मेलबोर्न मैदानावर जे दृश्य दिसले

मी गेल्या काही वर्षांत खूप क्रिकेट पाहिले. भारतीय चाहत्यांना विदेशात आपल्या संघाला प्रोत्साहन देतानादेखील पाहिले; पण रविवारी मेलबोर्न मैदानावर जे दृश्य दिसले, ते पाहण्यासाठी सज्ज नव्हतोच. मैदानात किमान ८६ हजार प्रेक्षक असावेत. त्यांत ७६ हजार भारतीय होते. आम्ही एखाद्या सामाजिक विषयाचे साक्षीदार होत आहोत, असा भास होत होता.असे का घडले? भारतीय आॅस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत यामुळे की आर्थिक सुबत्ता वाढल्याने भारतीय लोकांना आॅस्ट्रेलियात जाणे परवडण्यासारखे होते किंवा देशप्रेम वाढल्यामुळे हे लोक तेथे पोहोचलेत? २०११च्या वर्ल्डकपमध्ये ईडन गार्डनवर ६५ हजार प्रेक्षक होते. काही भारतीय खेळाडूंसाठी ही सर्वांत मोठी प्रेक्षकसंख्या होती; पण मेलबोर्नने उपस्थितीचे सर्व विक्रम मोडले.टीम इंडियात अचानक उत्साहाचा संचार झाला. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिका गमावल्यामुळे विश्वचषकातही अपयशाची शृंखला सुरू राहील, असे वाटत होते. संघ थकलेला असावा किंवा एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध वारंवार खेळल्याने असे घडले असावे. काही वर्षांआधी भारत दौऱ्यावर आलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला असाच खेळ करताना मी पाहिले आहे. संघाला ब्रेकचा लाभ झाला किंवा वर्ल्डकपमुळे संघात नवा उत्साह संचारला असावा. आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे नसल्याने टीम इंडिया उत्साही असावा. काहीही असो, टीम इंडियात फिल्डिंगमधील जोश, फलंदाजीतील सकारात्मक वृत्ती आणि गोलंदाजीत शिस्त आली. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध दयामाया दाखविण्याची वृत्ती संपली. सर्व समस्या आणि उणिवा डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप व्हावी इतक्या चुटकीसरशी संपुष्टात आल्याचे दिसत आहे.धवनने दाखवून दिले की, त्याला खेळविण्याच्या बाजूने अनेक जण का होते? तो लयीत असेल तर एकट्याच्या बळावर सामना जिंकण्याची ताकद बाळगतो. त्याने शिस्तबद्ध फलंदाजी करीत असे केलेदेखील. शिस्तीचा संचार झालेला नवा धवन आम्हाला दिसला. अखेरपर्यंत क्रिझवर थांबण्यासाठी त्याने स्वत:ला सज्ज केले असावे, असेही असू शकते. जेवढे चेंडू तो सोडून द्यायचा, तितका सहज खेळत होता. विराट कोहलीनेदेखील उणिवा मागे टाकल्या. स्टार स्पोर्ट्सने जो पिच मॅप दाखविला त्यानुसार पाकच्या गोलंदाजांनी त्याला इंग्लंडच्या गोलंदाजांसारखे अलगद जाळ्यात ओढणारे चेंडू टाकले; पण विराटने ते सोडून दिले, कारण क्रिझवर थांबलो की धावा येतील, हे त्याला ठाऊक असावे. सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे या आणखी दोन फलंदाजांची बॅट चांगलीच तळपली. रैनाच्या फटक्यात ताकद होती, तर अजिंक्यचे फटके क्लासिक होते. या दोघांना खेळताना पाहून घरच्या वातावरणात ते फलंदाजी करीत असल्याचा भास होत होता. खरे तर संघात उत्साह संचारल्याचा हा परिणाम होता. (टीसीएम)