शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' बॅडमिंटन स्पर्धेत ४८७ बॅडमिंटनपटूंचा सहभाग

By नारायण जाधव | Updated: August 6, 2022 19:42 IST

११, १३, १५ वर्षांखालील मुले, मुली तसेच खुला गट पुरूष, महिला अशा गटांमध्ये झाली स्पर्धा

नारायण जाधव, नवी मुंबई: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाच्या वतीने ‘अमृत महोत्सव बॅडमिंटन स्पर्धेचे; आयोजन ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन यांचे सहयोगाने 3 ते 5 ऑगस्ट 2022 या कालावधीत ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन येथील बॅडमिंटन कोर्टवर करण्यात आले होते.. या स्पर्धेला बॅडमिंटनपटूंचा उत्फुर्त सहभाग लाभला असून 11, 13, 15 वर्षाखालील मुले व मुली तसेच खुला गट पुरुष व महिला अशा 487 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला.

स्पर्धेचा शुभारंभ 3 ऑगस्ट 2022 रोजी उपआयुक्त श्री.मनोजकुमार महाले यांच्या शुभहस्ते, ऐरोली विभाग अधिकारी महेंद्र सप्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे तसेच ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव डॉ. हेमंत. अनार्थे व विश्वस्त श्री.प्रविण पैठणकर, स्पोर्ट्स कमिटी प्रमुख तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संपूर्ण देशात साज-या होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी मुंबईकर नागरिक देखील उत्साहाने सहभागी झाले असून शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता ‘अमृत महोत्सव बॅडमिंटन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीमुळे आयोजित करता न येऊ शकलेल्या स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला.

स्पर्धेतील अंतिम विजेते

11 वर्षातील मुले- प्रथम -रेवंत शृंगारपुरे, व्दितीय- आरव महेश्वर, तृतीय-पुर्वन कतक, चतुर्थ-ज्ञानेश पाटील

11 वर्षातील मुली- प्रथम- अक्षरा जाधव, व्दितीय -गीत नखरे, तृतीय -तनया औटी, चतुर्थ- रक्षा राठोड

13 वर्षातील मुले- प्रथम -मयुरेश भुतकी, व्दितीय -शौर्य कौशिक, तृतीय -वेदांग मिश्रा,चतुर्थ- अभय बिस्ट

13 वर्षातील मुली- प्रथम - श्वेतलाना मुखर्जी, व्दितीय-आर्या अय्यर, तृतीय -प्राक्षी जैन, चतुर्थ-तिशा श्रीवास्तव

15 वर्षातील मुले- प्रथम -रुजल वदाते, व्दितीय -वितरग शुक्ला, तृतीय -अर्णव पाटील, चतुर्थ- तनुश अढव

15 वर्षातील मुली- प्रथम-मनस्वी गौडा, व्दितीय -ज्वोहाना सिबी, तृतीय -आशिता रॉय, चतुर्थ-रेहा शहा

खुला गट महिला- प्रथम -अलका करायली, व्दितीय - मृदुला डाके, तृतीय- बितीका रॉय, चतुर्थ - नंदिनी शर्मा

खुला गट पुरुष- प्रथम- जिन्नांश जैन, व्दितीय -सौरव साळवी, तृतीय - अर्णव भोसले, चतुर्थ- संदिप पाटील

स्पर्धेतील विजयी खेळाडूंना क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे तसेच ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजय डोके,सचिव डॉ.हेमंत अनार्थे, सह सचिव तथा स्पोर्ट्स कमिटी प्रमुख प्रविण पैठणकर, कमिटी सदस्य अनंता कामत, जगदिश नायक, मोहन शेट्टी, मोहन सोमवंशी, अनुराग श्रीवास्तव, शिवा सर यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या अमृत महोत्सव बॅडमिंटन स्पर्धेस सर्व वयोगटातील  बॅडमिंटन खेळाडूंचा अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :BadmintonBadmintonNavi Mumbaiनवी मुंबईIndependence Dayस्वातंत्र्य दिन