शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मुंबईकरांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:25 IST

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे, ठाण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत आपली चमक दाखवली.चिपळून येथे महाराष्ट्र खो - खो संघटनेच्या मान्यतेने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या कुमार गटात मुंबईने जळगावचा २१-९ असा एक डाव व १२ गुणांनी फडशा पाडला. पहिल्याच डावात मुंबईने २१-४ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर जळगावने पुनरागमन करण्याचे प्रयत्नही केले नाहीत. दुसºया डावातही मुंबईच्या मुलांनी ५-० असे वर्चस्व राखत दणदणीत बाजी मारली. शुभम शिगवण, जितेश नेवाळकर यांचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला. आयुष गुरव आणि सनी तांबे यांनीही जबरदस्त आक्रमण करताना जळगावची दाणादाण उडवली. अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या कुमार संघाने कसलेल्या रत्नागिरीचे आव्हान १६-९ असे ७ गुणांनी परतावले. कर्णधार निहार दुबळे, सिध्देश थोरात आणि अक्षय कदम यांनी उपनगरचा विजय साकारला.मुलींच्या गटात मुंबईने सहज विजयी आगेकूच करताना धुळ्याचा २४-८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. मध्यंतराला मुंबईकरांनी २४-३ अशी भलीमोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. यानंतरही मुंबईकरांनी आपली पकड अधिक घट्ट करत धुळ्याची आव्हान संपुष्टात आणले. वैष्णवी परब, सायली म्हैसधुणे आणि शिवानी गुप्ता यांच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. त्याचवेळी, रत्नागिरीने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य मुंबई उपनगरला १७-१३ असा ४ गुणांनी धक्का दिला. पहिलेदोन्ही डाव अनुक्रमे ४-४, ६-६ असे बरोबरीत राहिल्यानंतर तिसºयाडावात रत्नागिरीने ७-३ अशी बाजी मारली. अपेक्षा सुतारने अप्रतिम अष्टपैलू खेळ करत रत्नागिरीचा एकाहाती विजय साकारला. उपनगरच्या आरती कदमची झुंजार खेळी अपयशी ठरली.।ठाण्याचे दुहेरी कूच...कुमार गटामध्ये ठाणे संघाने उस्मानाबादचे आव्हान १३-१० असे ३ गुणांनी परतावून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात एकतर्फी आघाडी घेत ठाणेकरांनी सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मुलींच्या गटातही ठाण्याने दणदणीत विजय मिळवताना औरंगाबादचा १०-५ असा एक डाव आणि ५ गुण राखून फडशा पाडला. रेश्मा राठोड, गितांजली नरसाळे आणि वृत्तिका सोनावणै यांनी ठाण्याच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले.