शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
3
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
4
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
5
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
6
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
7
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
8
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
9
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
10
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
11
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
12
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
13
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
14
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
15
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
16
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
17
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
18
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
19
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
20
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप

मुंबईकरांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:25 IST

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे, ठाण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत आपली चमक दाखवली.चिपळून येथे महाराष्ट्र खो - खो संघटनेच्या मान्यतेने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या कुमार गटात मुंबईने जळगावचा २१-९ असा एक डाव व १२ गुणांनी फडशा पाडला. पहिल्याच डावात मुंबईने २१-४ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर जळगावने पुनरागमन करण्याचे प्रयत्नही केले नाहीत. दुसºया डावातही मुंबईच्या मुलांनी ५-० असे वर्चस्व राखत दणदणीत बाजी मारली. शुभम शिगवण, जितेश नेवाळकर यांचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला. आयुष गुरव आणि सनी तांबे यांनीही जबरदस्त आक्रमण करताना जळगावची दाणादाण उडवली. अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या कुमार संघाने कसलेल्या रत्नागिरीचे आव्हान १६-९ असे ७ गुणांनी परतावले. कर्णधार निहार दुबळे, सिध्देश थोरात आणि अक्षय कदम यांनी उपनगरचा विजय साकारला.मुलींच्या गटात मुंबईने सहज विजयी आगेकूच करताना धुळ्याचा २४-८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. मध्यंतराला मुंबईकरांनी २४-३ अशी भलीमोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. यानंतरही मुंबईकरांनी आपली पकड अधिक घट्ट करत धुळ्याची आव्हान संपुष्टात आणले. वैष्णवी परब, सायली म्हैसधुणे आणि शिवानी गुप्ता यांच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. त्याचवेळी, रत्नागिरीने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य मुंबई उपनगरला १७-१३ असा ४ गुणांनी धक्का दिला. पहिलेदोन्ही डाव अनुक्रमे ४-४, ६-६ असे बरोबरीत राहिल्यानंतर तिसºयाडावात रत्नागिरीने ७-३ अशी बाजी मारली. अपेक्षा सुतारने अप्रतिम अष्टपैलू खेळ करत रत्नागिरीचा एकाहाती विजय साकारला. उपनगरच्या आरती कदमची झुंजार खेळी अपयशी ठरली.।ठाण्याचे दुहेरी कूच...कुमार गटामध्ये ठाणे संघाने उस्मानाबादचे आव्हान १३-१० असे ३ गुणांनी परतावून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात एकतर्फी आघाडी घेत ठाणेकरांनी सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मुलींच्या गटातही ठाण्याने दणदणीत विजय मिळवताना औरंगाबादचा १०-५ असा एक डाव आणि ५ गुण राखून फडशा पाडला. रेश्मा राठोड, गितांजली नरसाळे आणि वृत्तिका सोनावणै यांनी ठाण्याच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले.