शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मुंबईकरांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:25 IST

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे, ठाण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत आपली चमक दाखवली.चिपळून येथे महाराष्ट्र खो - खो संघटनेच्या मान्यतेने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या कुमार गटात मुंबईने जळगावचा २१-९ असा एक डाव व १२ गुणांनी फडशा पाडला. पहिल्याच डावात मुंबईने २१-४ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर जळगावने पुनरागमन करण्याचे प्रयत्नही केले नाहीत. दुसºया डावातही मुंबईच्या मुलांनी ५-० असे वर्चस्व राखत दणदणीत बाजी मारली. शुभम शिगवण, जितेश नेवाळकर यांचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला. आयुष गुरव आणि सनी तांबे यांनीही जबरदस्त आक्रमण करताना जळगावची दाणादाण उडवली. अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या कुमार संघाने कसलेल्या रत्नागिरीचे आव्हान १६-९ असे ७ गुणांनी परतावले. कर्णधार निहार दुबळे, सिध्देश थोरात आणि अक्षय कदम यांनी उपनगरचा विजय साकारला.मुलींच्या गटात मुंबईने सहज विजयी आगेकूच करताना धुळ्याचा २४-८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. मध्यंतराला मुंबईकरांनी २४-३ अशी भलीमोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. यानंतरही मुंबईकरांनी आपली पकड अधिक घट्ट करत धुळ्याची आव्हान संपुष्टात आणले. वैष्णवी परब, सायली म्हैसधुणे आणि शिवानी गुप्ता यांच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. त्याचवेळी, रत्नागिरीने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य मुंबई उपनगरला १७-१३ असा ४ गुणांनी धक्का दिला. पहिलेदोन्ही डाव अनुक्रमे ४-४, ६-६ असे बरोबरीत राहिल्यानंतर तिसºयाडावात रत्नागिरीने ७-३ अशी बाजी मारली. अपेक्षा सुतारने अप्रतिम अष्टपैलू खेळ करत रत्नागिरीचा एकाहाती विजय साकारला. उपनगरच्या आरती कदमची झुंजार खेळी अपयशी ठरली.।ठाण्याचे दुहेरी कूच...कुमार गटामध्ये ठाणे संघाने उस्मानाबादचे आव्हान १३-१० असे ३ गुणांनी परतावून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात एकतर्फी आघाडी घेत ठाणेकरांनी सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मुलींच्या गटातही ठाण्याने दणदणीत विजय मिळवताना औरंगाबादचा १०-५ असा एक डाव आणि ५ गुण राखून फडशा पाडला. रेश्मा राठोड, गितांजली नरसाळे आणि वृत्तिका सोनावणै यांनी ठाण्याच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले.