शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

रणजी चषकात मुंबईचा ४४ धावांत खुर्दा; दिवसभरात २२ बळींचा विक्रम

By admin | Updated: February 26, 2015 01:58 IST

बेंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई-कर्नाटक संघातील रणजी चषक स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात

पुणे : बेंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई-कर्नाटक संघातील रणजी चषक स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात दिवसभरात दोन्ही संघांचे २२ गडी बाद होण्याचा विक्रम बुधवारी झाला. कर्नाटकला पहिल्या डावांत २०२ धावांत गुंडाळल्यानंतर, तब्बल चाळीस वेळा रणजी चषक स्पर्धेतचा किताब पटकविणाऱ्या मुंबई संघाचा डाव अवघ्या ४४ धावांत संपुष्टात आला. मुंबईची ही आत्तापर्यंतची दुसरी निचांकी खेळी आहे. कर्नाटकचा कर्णधार आर. विनयकुमारने केवळ २० धावांत ६ गडी बाद करीत मुंबईच्या फलंदाजीच्या चिंध्या उडविल्या. कर्नाटकची दुसऱ्याडावात २ बाद १० अशी खराब सुरुवात झाली असली तरी त्यांच्याकडे १६८ धावांची आघाडी आहे. कर्नाटकने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीचा फलंदाज के. एल. राहुल (१५) याला शार्दुल ठाकूरने बी. एस. संधूकडे झेल देण्यास भाग पाडत कर्नाटकला पहिला धक्का दिला. पाठोपाठ आर. समर्थ (३) याला अखिल हेरवाडकर याने धावबाद केले. त्यामुळे कर्नाटकची अवस्था १ बाद १९ वरुन २ बाद ३४ अशी झाली. त्यानंतर आलेल्या एम. के पांडे (३४) याने सलामवीर रॉबिन उथप्पा (६८) याला सुरेख साथ दिली. उथप्पाने १ षटकार व १० चौकारांच्या सहाय्याने अर्धशतकी खेळी साजरी केली. या जोडीने ८१ धावांची भागिदारी केली. विल्किन मोटा याने उथप्पाला सुर्यकुमार यादव करवी झेलबाद करीत ही जोडी फोडली. त्यामुळे कर्नाटकची अवस्था ३ बाद ११५ झाली. त्यानंतर आलेल्या करुण नायर याने ७ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने ४९ धावांची नाबाद खेळी करीत संघाला द्वीशतकी मजल गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटकचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. शार्दुल ठाकूर याने ४, विल्किन मोटा याने २ बळी घेत कर्नाटकला २०२ धावांत रोखण्याची कामगिरी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १५.३ षटकांत ४४ धावांत आटोपला. एस. अय्यर (१५), सुर्यकुमार यादव (१२) यांचा अपवाद वगळता मुंबईचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारु शकला नाही. मुंबईचा सलामवीर अखिल हेरवाडकर, विल्किन मोटा, हरमित सिंग, बी. एस. संधु हे फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. आर. विनयकुमार याने २० धावांत ६, एस. अरविंद याने १ धावांत २ बळी घेत मुंबईची फलंदाजी मोडून काढली. दिवसाअखेर कर्नाटकच्या दुसऱ्या डावांत ५ षटकांत २ बाद दहा धावा अशी खराब सुरुवात झाली आहे. सलामवीर उथप्पा (४), केएल राहुल (२) झटपट बाद झाले. ए. मिथुन व आर. समर्थ खेळत आहेत.