शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

मुंबईची महाराष्ट्रावर मात

By admin | Updated: January 9, 2016 03:18 IST

कर्णधार आदित्य तरेने केलेल्या शानदार कॅप्टन्स इनिंगच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला ८ विकेट्सने नमवले

कटक : कर्णधार आदित्य तरेने केलेल्या शानदार कॅप्टन्स इनिंगच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला ८ विकेट्सने नमवले. विशेष म्हणजे अन्य एका सामन्यात यूपीने सेनादल संघाला नमवल्याचा फायदा मिळाल्याने मुंबईने स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत प्रवेश केला. यूपीने सर्वधिक २० गुणांसह ‘ड’ गटात अग्रस्थान पटकावले. तर मुंबई व महाराष्ट्राने प्रत्येकी १२ गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धवल कुलकर्णीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर महाराष्ट्राने डाव सावरताना निर्धारीत २० षटकांत ८ बाद १५५ धावांची समाधानकारक मजल मारली. या आव्हानाच पाठलाग करताना अखिल हेरवाडकर - श्रेयश अय्यर यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली. हेरवाडकर १५ चेंडूत २१ धावा काढून परतल्यानंतर श्रेयश व आदित्य यांनी ४९ धावांची भागीदारी करुन मुंबईला सावरले.अय्यर २३ चेंडूत ३८ धावा काढून सत्यजीत बच्चवचा शिकार ठरला. यानंतर मात्र आदित्य आणि सिध्देश लाड यांनी अखेरपर्यंत नाबाद राहताना ८३ धावांची तुफानी भागीदारी करुन मुंबईला १६.१ षटकांत विजयी केले. आदित्यने ३९ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. तर सिध्देशने २० चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ३१ धावा काढल्या. तत्पूर्वी पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर महाराष्ट्राने संयमी खेळी करताना ८ बाद १५५ धावांची मजल मारली. प्रयाग भाटी (३६) आणि निखिल नाईक (३१) यांनी उपयुक्त खेळी करताना संघाला दिडशेचा पल्ला गाठून देण्यात मदत केली. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, सागर त्रिवेदी व अभिषेक नायर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.