शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची महाराष्ट्रावर मात

By admin | Updated: January 9, 2016 03:18 IST

कर्णधार आदित्य तरेने केलेल्या शानदार कॅप्टन्स इनिंगच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला ८ विकेट्सने नमवले

कटक : कर्णधार आदित्य तरेने केलेल्या शानदार कॅप्टन्स इनिंगच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला ८ विकेट्सने नमवले. विशेष म्हणजे अन्य एका सामन्यात यूपीने सेनादल संघाला नमवल्याचा फायदा मिळाल्याने मुंबईने स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत प्रवेश केला. यूपीने सर्वधिक २० गुणांसह ‘ड’ गटात अग्रस्थान पटकावले. तर मुंबई व महाराष्ट्राने प्रत्येकी १२ गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धवल कुलकर्णीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर महाराष्ट्राने डाव सावरताना निर्धारीत २० षटकांत ८ बाद १५५ धावांची समाधानकारक मजल मारली. या आव्हानाच पाठलाग करताना अखिल हेरवाडकर - श्रेयश अय्यर यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली. हेरवाडकर १५ चेंडूत २१ धावा काढून परतल्यानंतर श्रेयश व आदित्य यांनी ४९ धावांची भागीदारी करुन मुंबईला सावरले.अय्यर २३ चेंडूत ३८ धावा काढून सत्यजीत बच्चवचा शिकार ठरला. यानंतर मात्र आदित्य आणि सिध्देश लाड यांनी अखेरपर्यंत नाबाद राहताना ८३ धावांची तुफानी भागीदारी करुन मुंबईला १६.१ षटकांत विजयी केले. आदित्यने ३९ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६५ धावा केल्या. तर सिध्देशने २० चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ३१ धावा काढल्या. तत्पूर्वी पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर महाराष्ट्राने संयमी खेळी करताना ८ बाद १५५ धावांची मजल मारली. प्रयाग भाटी (३६) आणि निखिल नाईक (३१) यांनी उपयुक्त खेळी करताना संघाला दिडशेचा पल्ला गाठून देण्यात मदत केली. मुंबईकडून धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, सागर त्रिवेदी व अभिषेक नायर यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.