शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटच्या प्रश्नावर मोदींचे स्मित

By admin | Updated: December 13, 2015 02:38 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर, उभय संघांदरम्यान मालिकेचा निर्णय खेळाडू नाही तर सरकार घेईल, असे मत विश्वकप विजेते भारतीय कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. दोन्ही दिग्गज अष्टपैलू कपिल व इम्रान एका वृत्तवाहिनीतर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इम्रान यांनी सांगितले, ‘‘उभय देशांदरम्यान क्रिकेट होणे आवश्यक आहे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उभय देशांदरम्यान क्रिकेट व्हायला पाहिजे, असे म्हटले, त्या वेळी मोदी यांनी केवळ स्मित केले. त्यांचा होकार होता की नकार, हे मला कळाले नाही. मी सकारात्मक विचार करणारा असल्यामुळे मी होकारच समजतो.’’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यात मालिका प्रस्तावित आहे. त्यासाठी उभय देशांच्या बोर्डांची सहमती आहे; पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या मालिकेसाठी अद्याप सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलीकडचे स्पष्ट केले, की मालिकेच्या आयोजनासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आम्हाला अद्याप सरकारकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तान तहरिके इन्साफ पार्टीचे अध्यक्ष असलेले इम्रान म्हणाले, ‘‘ज्या वेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी पाकिस्तानच्या नागरिकांनाही दु:ख झाले. काही लोकांच्या कृत्यामुळे कुणी पूर्ण देशाची मानसिकता ठरवू शकत नाही. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. क्रिकेट खेळणे बंद करणे यावरचा उपाय नाही. आमची संस्कृती एक आहे.’’इम्रान पुढे म्हणाले, ‘‘मी काही मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला नसून काही करण्यासाठी त्याचा स्वीकार केला आहे. मी पंतप्रधान होण्यास इच्छुक नसून लोकांची सेवा करण्यास प्रयत्नशील आहे.’’(वृत्तसंस्था) खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत; पण देशाच्या निर्णयाविरुद्ध जाणार नाहीत. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. क्रिकेट मालिकेबाबतचा निर्णय देशाचे सरकार घेईल, खेळाडू नाही.- कपिलदेव, माजी कर्णधार, भारतआमचा मैत्रीपूर्ण वातावरणात खेळण्याचा प्रयत्न असायचा; पण चाहत्यांची गर्दी बघितल्यानंतर आमच्यावर दडपण येत होते. पराभव स्वीकारावा लागला, तरी कठीण होत असे. एक वेळ कोलकात्यामध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, त्या वेळी कुणी जागे राहणार नाही, याची खबरदारी घेत पाकिस्तानमध्ये दाखल झालो होतो.- इम्रान खान