शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

क्रिकेटच्या प्रश्नावर मोदींचे स्मित

By admin | Updated: December 13, 2015 02:38 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करायला पाहिजे, असे मत विश्वकप विजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांनी व्यक्त केले. तर, उभय संघांदरम्यान मालिकेचा निर्णय खेळाडू नाही तर सरकार घेईल, असे मत विश्वकप विजेते भारतीय कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. दोन्ही दिग्गज अष्टपैलू कपिल व इम्रान एका वृत्तवाहिनीतर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इम्रान यांनी सांगितले, ‘‘उभय देशांदरम्यान क्रिकेट होणे आवश्यक आहे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उभय देशांदरम्यान क्रिकेट व्हायला पाहिजे, असे म्हटले, त्या वेळी मोदी यांनी केवळ स्मित केले. त्यांचा होकार होता की नकार, हे मला कळाले नाही. मी सकारात्मक विचार करणारा असल्यामुळे मी होकारच समजतो.’’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यात मालिका प्रस्तावित आहे. त्यासाठी उभय देशांच्या बोर्डांची सहमती आहे; पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) या मालिकेसाठी अद्याप सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलीकडचे स्पष्ट केले, की मालिकेच्या आयोजनासाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आम्हाला अद्याप सरकारकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तान तहरिके इन्साफ पार्टीचे अध्यक्ष असलेले इम्रान म्हणाले, ‘‘ज्या वेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळी पाकिस्तानच्या नागरिकांनाही दु:ख झाले. काही लोकांच्या कृत्यामुळे कुणी पूर्ण देशाची मानसिकता ठरवू शकत नाही. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. क्रिकेट खेळणे बंद करणे यावरचा उपाय नाही. आमची संस्कृती एक आहे.’’इम्रान पुढे म्हणाले, ‘‘मी काही मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश केला नसून काही करण्यासाठी त्याचा स्वीकार केला आहे. मी पंतप्रधान होण्यास इच्छुक नसून लोकांची सेवा करण्यास प्रयत्नशील आहे.’’(वृत्तसंस्था) खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत; पण देशाच्या निर्णयाविरुद्ध जाणार नाहीत. उभय देशांदरम्यानचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. क्रिकेट मालिकेबाबतचा निर्णय देशाचे सरकार घेईल, खेळाडू नाही.- कपिलदेव, माजी कर्णधार, भारतआमचा मैत्रीपूर्ण वातावरणात खेळण्याचा प्रयत्न असायचा; पण चाहत्यांची गर्दी बघितल्यानंतर आमच्यावर दडपण येत होते. पराभव स्वीकारावा लागला, तरी कठीण होत असे. एक वेळ कोलकात्यामध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, त्या वेळी कुणी जागे राहणार नाही, याची खबरदारी घेत पाकिस्तानमध्ये दाखल झालो होतो.- इम्रान खान