शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

राज्यातील पदक विजेते रोख पुरस्कारांच्या प्रतीक्षेत, अध्यादेशाअभावी खेळाडू अद्यापही वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 23:07 IST

राज्य शासन रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील इतर राज्यातील पदक विजेत्यांना त्यांच्या मार्गदर्शकांसह कोट्यवधींच्या रोख रकमेची पारितोषिके देत आहे.

शिवाजी गोरेपुणे- राज्य शासन रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील इतर राज्यातील पदक विजेत्यांना त्यांच्या मार्गदर्शकांसह कोट्यवधींच्या रोख रकमेची पारितोषिके देत आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फुटबॉलचे वातावरण निर्मितीसाठी आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावून आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. हे सर्व गेल्या ८ ते ९ महिन्यांत शासकीय स्तरावर अध्यादेश काढून केले जात आहे.दुसरीकडे २०१५ मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यासाठी दोन वर्षांपासून अध्यादेश निघू शकला नाही. खेळाडूंच्या तोंडाला केवळ पाने पुसली जात आहेत. यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे. केरळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३० सुवर्ण, ४३ रौप्य व ५० कास्यपदके जिंकली होती.रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक विजेत्या परराज्यातील खेळाडूंना कोट्यवधींची रोख पारितोषिके दिली गेली. पण दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात आलेली नाहीत. जोपर्यंत अध्यादेश काढला जात नाही तोपर्यंत रोख पुरस्काराची रक्कम देता येणार नाही, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी अनेक वेळा म्हटले आहे. भाजपा शासनामधील कोणत्याही मंत्र्यांनी ती घोषणा केली नसल्याचे कारण सांगितले जात आहे. याचबरोबर अजित पवार त्यावेळी अर्थमंत्री होते. त्यांनी तो पारितोषिकेचा निधी कोणत्या तरतुदीखाली मंजूर केला हे त्यांनाच माहिती.कोणत्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना जर आपल्याला रोख पारितोषिके द्यायची असतील तर त्यासाठी वेगळा अध्यादेश काढावा लागतो. पण ती फाईल कुठपर्यंत आली, हे गुलदस्त्यात आहे. परराज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना कोट्यवधींची आणि फिफा वर्ल्डकप अंतर्गत राज्यात फुटबॉलचा प्रचार व प्रसार करण्यासाठी देण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, मुंबई येथे आयोजित केलेल्या राजकीय नेत्यांच्या फुटबॉल स्पर्धेचा निधी आणि सध्या एटीपी टेनिस स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याचा अध्यादेश जर सहा महिन्यात निघू शकतो तर मग २०१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख रकमा ऐवढी प्रतीक्षा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खेळाडूंना राजकारणाचा फटका?केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ३० सुवर्ण, ४३ रौप्य आणि ५० कांस्य पदके पटकावली होती. मात्र तीन वर्षे झाली तरी या पदक विजेत्यांना महाराष्ट्र शासनाने रोख बक्षिसे देऊन अद्याप गौरविलेले नाही. मी किंवा मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना रोख बक्षिसे देऊ, असे जाहीर केलेले नाही, असे क्रीडामंत्री विनोद तावडे गेल्या वर्षी जुलैत म्हणाले होते. मात्र त्याच वेळी त्यांनी या खेळाडूंना बक्षिसे द्यायला हवीत, असेही म्हटले होते. त्यासाठी तरतूद करावी लागेल, शासन निर्णय करावा लागेल, असे ते म्हणाले होते. एमओएचे अध्यक्ष अजित पवार हे अर्थमंत्री होते, त्या वेळी त्यांनी मागे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना रोख बक्षिसे दिली होती. त्याचा दाखला दिल्यानंतर त्यांनी कोठून तरी तरतूद केली होती, असे तावडेंनी सांगितले होते.

टॅग्स :Sportsक्रीडा