शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

आक्रमक पवित्रा कायम राखणार

By admin | Updated: December 17, 2014 01:29 IST

मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक पवित्रा कायम राखणार

ब्रिसबेन : मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आक्रमक पवित्रा कायम राखणार असल्याचे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अ‍ॅडिलेड कसोटीमध्ये ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.अंगठ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणारा धोनी म्हणाला, ‘आक्रमक पवित्रा स्वीकारण्याचा निर्णय योग्यच होता. आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. विराट कोहली व मुरली विजय यांच्यादरम्यानच्या भागीदारीमुळे आम्ही लक्ष्याच्या समीप पोहोचलो होतो, पण विजय बाद झाल्यानंतर काही विकेट झटपट गेल्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यात अपयश आले. त्यानंतर सामना अनिर्णित राखणेही कठीण होते. त्यामुळे आम्हाला केवळ विजयासाठी प्रयत्न करावे लागले. भविष्यातही आक्रमक पवित्रा कायम राहणार आहे. त्यासाठी चांगली सुरुवात, मोठी भागीदारी आणि विशाल धावसंख्या आवश्यक आहे. सूर गवसल्यानंतरच पुढे काय करायचे, याचा निर्णय घेता येतो.’भारतीय संघातील एकाही खेळाडूला या मैदानावर कसोटी खेळण्याचा अनुभव नाही. धोनी संघात पुनरागमन करीत असून हा ब्रेक माझ्यासाठी गरजेचा होता, असेही धोनी म्हणाला.धोनीने पुढे सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान मला दुखापत झाली होती. खेळत राहिलो तर दुखापत ठीक होईल, असे वाटत होते, पण चॅम्पियन्स लीग व वन-डे खेळल्यानंतर ही दुखापत चिघळली असल्याचे माझ्या लक्षात आले. श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेतून माघारीचा निर्णय महत्त्वाचा होता. कारण आॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची होती. त्यानंतर विश्वकप स्पर्धा आहे. त्यामुळे २०-२५ दिवसांचा घेतलेल्या ब्रेकमुळे दुखापतीतून सावरता आले.’ (वृत्तसंस्था)दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘अ‍ॅडिलेडच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असेल. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहील. खेळपट्टी चांगली भासत असली तरी फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता धुसर आहे. गोलंदाजांच्या फुटमार्कमुळे आॅफ स्पिनरला मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.’धोनीने आर. अश्विनला अंतिम संघात स्थान देण्याचे संकेत देताना म्हटले की,‘अश्विनमुळे तळाच्या फलंदाजीला बळकटी मिळले. तळाचे फलंदाज झटपट बाद होतात, असा अनुभव आहे. अश्विन असेल तर दुसऱ्या टोकाकडून खेळणाऱ्या फलंदाजाला मदत मिळेल.’ (वृत्तसंस्था)