शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शेतकरी बापाच्या 'कर्जा'चं ऋण फेडलं; खेलो इंडियात पोरीनं 'सुवर्ण' जिंकलं!

By स्वदेश घाणेकर | Updated: January 16, 2020 10:25 IST

आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या या सुवर्णकन्येचं कौतुक

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया २०२० स्पर्धेत पदकांचे शतक साजरं करण्याचा मान महाराष्ट्राने सर्वप्रथम पटकावला आहे. यात कोल्हापूरच्या एका खेळाडूनं पदकांचा नुसता 'धुरळा' उडवला आहे. या स्पर्धेत तिनं चार सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेली, त्यामुळेच संकटासमोर न खचता लढण्याचे बाळकडू लहानपणीच प्यायलेल्या पूजा दानोळेनं गुवाहाटीत आपला दबदबा दाखवून दिला आहे.

दमदार कामगिरी करण्याच्या आत्मविश्वासानेच पूजा या स्पर्धेत सायकलिंग ट्रॅकवर उतरली होती. पण आपण राष्ट्रीय विक्रम मोडू शकू का, याबद्दल मनात जरा शंकाच होती, असं मूळच्या इंगळी गावातील पूजानं सांगितलं. सुरुवातीपासून स्विमिंगची ( जलतरण) आवड असलेली पूजा अपघातानं सायकलिंगमध्ये आली. शाळेत असताना सायकलशी संबंध केवळ ट्रायथलॉन क्रीडा प्रकारापुरता यायचा. पण शाळेतील शिक्षकांनी पूजामध्ये असलेले टॅलेंट हेरलं आणि तिला सायकलिंग स्पर्धेसाठी बोलावलं.

त्या स्पर्धेत पडली नसती, तर आज ती या खेळात नसती!पहिल्याच  जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या पूजानं तिसरं स्थान पटकावलं. तिनं सांगितलं, "ट्रायथलॉन पुरती मी सायकलिंग करायची. पण शाळेतील शिक्षकांनी मला जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यास सांगितलं. स्पर्धेत एका वळणावर मी पडले. पण, त्यानंतर जिद्दीने उभी राहताना तिसरं स्थान पटकावलं. त्याचवेळी पुढच्याचवर्षी ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला आणि सायकलिंगची सुरुवात केली. पुढील वर्षी स्पर्धा जिंकून मला दीपाली पाटील मॅडमनी बालेवाडीत प्रवेश घेण्यास सांगितले. तिथून सायकलिंगचा प्रवास सुरू झाला." 

पूजानं पहिल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत केवळ सहभाग घेतला होता. तेव्हा तिनं या खेळाचे बारकावे जाणून घेतले. त्यानंतर पुढील स्पर्धेत पदकांची लयलूट केली. त्यामुळे तिला राष्ट्रीय कॅम्पसाठी दिल्लीत भारतीय क्रीडा प्राधिकरणात बोलावणे आले. मागील चार वर्षांपासून ती सायकलिंग करत आहे. कोल्हापूरमध्ये पूजा दररोज २५-२५ किलोमीटर सायकलिंग करून सराव करायची. वडील आणि मोठा भाऊ दोघेही खेळाडू असल्यानं त्यांच्याकडूनही तिला प्रोत्साहन मिळालं.

पूजाचे वडील बबन दानोळे हे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत, तर भाऊ हर्षद हाही राष्ट्रीय पदकविजेता कुस्तीपटू आहे. त्यामुळे घरातून प्रोत्साहन मिळतच होतं. पण, या क्षेत्राशी संबंध नसतानाही पूजाची आई अर्चना यांचा या यशात खारीचा वाटा आहे. अपयश आले तरी खचू नकोस, प्रयत्न करत रहा, एकदिवस यश नक्की मिळेल, हे आई सतत सांगते आणि त्यामुळेच मला संघर्ष करण्याची ताकद मिळते, असं पूजाने सांगितले. 

सायकलिंग हा महागडा खेळ. त्यामुळे शेतकरी कुटुंबाला तो परवडणं शक्य नाही. पण, मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी कर्ज काढलं आहे. पूजाच्या यशानं त्या कर्जाचं ऋण फेडल्याची भावना नक्की वडिलांच्या मनात असेल. शेतीसोबतच पूजाचे वडील खासगी बँकेत क्लार्क म्हणून कामाला आहेत. पूजाच्या स्वप्नासाठी त्यांनी जवळपास पाच लाखांचं कर्ज काढलं आहे.

खाशाबा जाधवांसारखा पराक्रम करायचाय! 

भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक जिंकून देण्याचा मान हा महाराष्ट्राच्या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावावर आहे. तसाच मान पूजाला पटकवायचा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सायकलिंगमध्ये भारताचे पहिले प्रतिनिधित्व आणि पहिले पदक तिला जिंकायचे आहे. २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तयारीही सुरू केल्याचे तिने सांगितले.  आता अकरावीत असलेल्या पूजाला पदवीधर अभ्यास पूर्ण करून आयपीएस अधिकारीही बनायचे आहे. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या पूजाचे कौतुकमहाराष्ट्राच्या पूजाने तीन सुवर्णपदके मिळविल्याचे समजल्यावर सोनोवाल यांनी आसामचे मुख्यमंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी कौतुक केले. महाराष्ट्रातून कुठून आलीस, घरी कोण आहे, आई वडिल काय करतात असे विचारल्यावर त्यांनी तुझ्याबरोबर आई वडिलांचेही अभिनंदन करायला हवे आणि भेटल्यावर त्यांना माझा नमस्कार सांग असेही त्यांनी सांगितले 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरCyclingसायकलिंग