शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

महाराष्ट्राला दुहेरी विजयाची संधी

By admin | Updated: June 13, 2016 04:23 IST

बलाढ्य महाराष्ट्र संघाने केरळचा २१-१२ असा पराभव करत २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केली.

मुंबई : मध्यांतराला बरोबरी राहिल्यानंतर बलाढ्य महाराष्ट्र संघाने केरळचा २१-१२ असा पराभव करत २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केली. तर महिलांच्या गटातही केरळला ११-७ असे १ डाव व ४ गुणांनी लोळवून महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठताना दुहेरी विजेतेपदाची संधी निर्माण केली.भुवनेश्वरला सुरु असलेल्या स्पर्धेच्या पुरुष गटात महाराष्ट्र व केरळ यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघांनी केलेल्या दमदार खेळामुळे मध्यांतरापर्यंत सामना ८-८ असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या डावात मात्र महाराष्ट्राने जोरदार आक्रमण करत केरळचे १३ गडी टिपून भक्कम आघाडी मिळवली. महाराष्ट्राच्या संरक्षणात दिपक माने (३.१०मिनिटे) व कर्णधार महेश शिंदे (२.१० व १.३० मिनिटे ) यांनी चमकदार खेळ केला. मध्यांतरानंतर मारलेल्या मुसंडीमुळे महाराष्ट्राने केरळचा २१-१२ असा धुव्वा उडवला. महिला गटातही केरळला महाराष्ट्राकडून पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या सावंतने पहिल्या डावात तर कविता घाणेकरने दुसऱ्या डावात प्रत्येकी ३.५० मिनिटे संरक्षण केले. त्यांना पोर्णिमा सकपाळेने चांगली साथ दिली. शिवाय आक्रमणातही पोर्णिमाने ३ गडी बाद करुन अष्टपैलू खेळ केला. उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने केरळचा ११-७ असा १ डाव व ४ गुणांनी नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)>किशोर - किशोरी चमकले२७ व्या सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघांनी आपला दबदबा सिध्द करताना अनुक्रमे कर्नाटक व दिल्लीचा पाडाव करत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या किशोर संघाने राहूल जाधवच्या (४.१०व २ मिनिटे) जोरावर कर्नाटकचा ९-५ असा १ डाव ४ गुणांनी फडशा पाडला. तर किशोरी संघाने दिल्लीचा ११-४ असा १ डाव व ७ गुणांनी धुव्वा उडवला. पुरुष व महिला संघाच्या अंतिम फेरीनंतर महाराष्ट्राला विजेतेपदासाठी किशोर गटात झारखंड विरुद्ध तर किशोरी गटात कर्नाटकविरुद्ध भिडावे लागेल.