शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मिळालेल्या प्रेमामुळे मुंबई सोडण्याची इच्छा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:17 IST

यंदाचा मोसम खूप विशेष आहे. मी मूळचा हरियाणाचा असून लीगमध्ये पहिल्यांदा हरियाणाविरुद्ध खेळेल. सुरुवातीला मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली

- रोहित नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाचा मोसम खूप विशेष आहे. मी मूळचा हरियाणाचा असून लीगमध्ये पहिल्यांदा हरियाणाविरुद्ध खेळेल. सुरुवातीला मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली, परंतु आजपर्यंत मुंबईकरांनी दिलेल्या प्रेमामुळे मला मुंबई सोडून जावेसे वाटत नाही. मुंबईकरांनी दिलेल्या प्रेमामुळे मी स्वत:ला मुंबईकर समजतो, असे कबड्डी स्टार आणि यू मुम्बा संघाचा कर्णधार अनुप कुमारने ‘लोकमत’शी बोलताना म्हटले.प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाला २८ जुलैपासून सुरुवात होत असून यावेळी ४ नव्या संघांचा स्पर्धेत प्रवेश झाला आहे. त्यात हरियाणाचाही समावेश आहे. याविषयी अनुपला विचारले असता तो म्हणाला की, ‘नक्कीच कर्णधार म्हणून मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली. परंतु, शेवटी हा खेळ आहे आणि खेळामध्ये असे होत असते. राष्ट्रीय स्पर्धेत याआधीही मी दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना हरियाणाविरुध्द खेळलो असल्याने हरियाणाविरुद्धचा सामना माझ्यासाठी इतर सामन्यांप्रमाणेच असेल.’लिलाव प्रक्रियेनंतर बदललेल्या संघाबाबत अनुप म्हणाला की, ‘संघ बदलल्यानंतर सर्वच गोष्टींमध्ये बदल होतात. आत्ताचा संघही चांगला असून प्रशिक्षकांना आमच्या विश्वास आहे. शिवाय आमच्याकडे ६-७ वरिष्ठ खेळाडू असून ते कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळू शकतात.’ त्याचप्रमाणे, ‘यावर्षी आम्ही सराव शिबिर डेहराडून येथे पार पाडले. तिथल्या वातावरणाचा आम्हाला खूप फायदा झाला. कमी आॅक्सिजनमध्ये सराव केल्याने आम्हाला तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देण्यास सोपे गेले,’ असेही अनुपने म्हटले. यंदाचे सत्र तीन महिने खेळविण्यात येणार असल्याने तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना अनुपने म्हटले की, ‘तंदुरुस्ती नसेल तर कोणताच खेळाडू इतका मोठा मोसम खेळू शकणार नाही. खेळाडू तंदुरुस्त असेल तर तो दुखापतींपासून दूर राहिल. यासाठीच, अनेकांनी वैयक्तिक टे्रनरची नियुक्ती केली आहे. तंदुरुस्ती टिकवण्याचे मोठे आव्हान प्रत्येक खेळाडूपुढे असेल.’ स्पर्धेतील प्रत्येक संघ नविन असल्याने प्रत्येकापुढे आव्हान असून मुंबईचा संघ समतोल आहे. आम्ही तंदुरुस्ती टिकवण्यावर अधिक भर दिला आहे. शिवाय मुंबईची राखीव फळी नेहमीप्रमाणे मजबूत राखण्यात आम्हाला यश आले असून ही आमची जमेची बाजू आहे. - ई. भास्करण, प्रशिक्षक - यू मुम्बाआम्ही लीगसाठी सज्ज आहोत. डेहराडूनमधील सराव खूप फायदेशीर ठरला. याआधी प्रतिनिधित्त्व केलेल्या दिल्ली संघाच्या तुलनेत मुंबई संघात खूप फरक आहे. स्पर्धेत बहुतेक खेळाडू एकमेकांचा खेळ जाणून असल्याने सामने खूप चुरशीच्या होतील. युवा खेळाडूही चांगले खेळत असल्याने संघाला बळकटी आली आहे.- काशिलिंग आडके, आक्रमकसराव शिबिरात फिटनेसवर अधिक भर देण्यात आल्याने संघातील सर्व खेळाडू फिट आहेत. कर्णधार अनुपचा खूप फायदा होतो. तो सर्वोत्तम कर्णधार आहे. प्रत्येकावर त्याचे बारीक लक्ष असते. ज्याप्रकारे तो सामन्यात शांत असतो, तसाच सरावामध्येही असतो. - नितिन मदने, आक्रमक.