शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे फलंदाज गमावल्यामुळे पुनरागमन करणे कठीण होते

By admin | Updated: April 14, 2015 00:57 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीतील अष्टपैलू कामगिरी अखेर व्यर्थच ठरल्यामुळे आॅफस्पिनर हरभजन सिंग निराश झाला.

मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीतील अष्टपैलू कामगिरी अखेर व्यर्थच ठरल्यामुळे आॅफस्पिनर हरभजन सिंग निराश झाला. मुंबई इंडियन्सचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे सामन्यात पुनरागमन करणे कठीण होेते, अशी प्रतिक्रिया हरभजनने व्यक्त केली. हरभजनने सुरुवातीला गोलंदाजीमध्ये छाप सोडताना ४ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्यानंतर त्याने फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करीत ६४ धावा फटकावल्या. त्यात ६ षटकारांचा समावेश आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना हरभजन म्हणाला, ‘‘आम्ही सुरुवातीला अधिक फलंदाज गमावले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. सुरुवातीला भागीदारी झाली असती आमचा डाव सावरला गेला असता, पण असे घडले नाही. त्याचे श्रेय पंजाब संघाच्या गोलंदाजांना मिळायलाच हवे. त्यांनी नव्या चेंडूने चांगला मारा केला. ४ बाद २५ आणि त्यानंतर ५ बाद ४६ अशी अवस्था असताना पुनरागमन करणे कठीण होते. आमच्यासाठी ही लढत चांगली ठरली नाही, पण अखेर लक्ष्याच्या समीप जाण्यास यशस्वी ठरल्यामुळे समाधान वाटले. त्यामुळे यानंतर खेळल्या जाणाऱ्या लढतींसाठी आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.’’ हरभजन म्हणाला, ‘‘आम्हाला चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. रोहित लवकर बाद झाल्यामुळे संघाला धक्का बसला. कोरी अँडरसन व किरोन पोलार्ड संघात असले, तरी रोहितकडून संघाला मोठ्या खेळीची गरज होती. (वृत्तसंस्था)मुंबई इंडियन्स संघासाठी गोलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत चांगली कामगिरी करणे आवश्यक असते. रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत आम्ही अधिक धावा बहाल केल्या. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय यांनी सुरुवातीला वेगाने धावा फटकावल्या. पंजाब संघाने पहिल्या पाच षटकांत जवळजवळ अर्धशतकाची मजल मारली होती. त्यानंतर आम्ही पंजाब संघाच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवले. या खेळपट्टीवर १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य होते. रोहित शर्मा सुरुवातीलाच बाद झाल्यामुळे संघ अडचणीत आला.- हरभजन सिंग